शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उपराजधानी नागपूरला २ हजार ५७८ नवीन पोलिस पदे हवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:36 IST

Nagpur : हायकोर्टाने विचारले, गृह विभागाचा निर्णय काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांना न्याय देण्याकरिता नागपूरपोलिस आयुक्तालयाला ३९१, तर नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला २ हजार १८७ नवीन पदांची गरज आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या २८ एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले. 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नागपूर पोलिस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ कार्यरत असणे आवश्यक आहे. सध्याच्या पोलिस बलामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे, असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत २२ पोलिस ठाणे व ६ उप-विभाग, तर पोलिस आयुक्तालयांतर्गत ३६ पोलिस ठाणे व ५ उप-विभाग कार्यरत आहेत. ग्रामीणच्या २ हजार १८७ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक २३४ कोटी १५ लाख ६५ हजार २५६ रुपये, तर शहराच्या ३९१ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक १७कोटी ९ लाख १७ हजार ३२० रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गृह विभागाला सांगितले. 

शहरात आवश्यक पदे

  • सहायक उपनिरीक्षक - ०६
  • पोलिस हेड कॉन्स्टेबल - ४२
  • पोलिस कॉन्स्टेबल - २०७
  • पोलिस अंमलदार - १३६

ग्रामीणला आवश्यक नवीन पदे

  • पोलिस निरीक्षक - १६
  • सहायक पोलिस निरीक्षक - ३७
  • पोलिस उप-निरीक्षक - १५८
  • सहायक पोलिस उप-निरीक्षक - २४६
  • पोलिस हवालदार - ६९१
  • पोलिस शिपाई - १०३९

जनहित याचिका प्रलंबित

  • रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
  • अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे.
  • याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर