शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी नागपूरला २ हजार ५७८ नवीन पोलिस पदे हवीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:36 IST

Nagpur : हायकोर्टाने विचारले, गृह विभागाचा निर्णय काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्यांना न्याय देण्याकरिता नागपूरपोलिस आयुक्तालयाला ३९१, तर नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाला २ हजार १८७ नवीन पदांची गरज आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावावर घेण्यात आलेला निर्णय येत्या २८ एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले. 

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नागपूर पोलिस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबविण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलिस बळ कार्यरत असणे आवश्यक आहे. सध्याच्या पोलिस बलामध्ये या जबाबदाऱ्या पूर्ण करणे अशक्य होत आहे, असे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत २२ पोलिस ठाणे व ६ उप-विभाग, तर पोलिस आयुक्तालयांतर्गत ३६ पोलिस ठाणे व ५ उप-विभाग कार्यरत आहेत. ग्रामीणच्या २ हजार १८७ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक २३४ कोटी १५ लाख ६५ हजार २५६ रुपये, तर शहराच्या ३९१ नवीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक १७कोटी ९ लाख १७ हजार ३२० रुपये खर्च अपेक्षित आहे, असेही गृह विभागाला सांगितले. 

शहरात आवश्यक पदे

  • सहायक उपनिरीक्षक - ०६
  • पोलिस हेड कॉन्स्टेबल - ४२
  • पोलिस कॉन्स्टेबल - २०७
  • पोलिस अंमलदार - १३६

ग्रामीणला आवश्यक नवीन पदे

  • पोलिस निरीक्षक - १६
  • सहायक पोलिस निरीक्षक - ३७
  • पोलिस उप-निरीक्षक - १५८
  • सहायक पोलिस उप-निरीक्षक - २४६
  • पोलिस हवालदार - ६९१
  • पोलिस शिपाई - १०३९

जनहित याचिका प्रलंबित

  • रोडवरील खड्डे प्राणघातक अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्यामुळे उच्च न्यायालयाने २०२० मध्ये स्वतःच फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
  • अपघात थांबविण्यासाठी पोलिसांनीही आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी पोलिस विभागाला प्रभावीपणे कर्तव्य बजावणे अशक्य होत आहे.
  • याकरिता या प्रकरणात पोलिसांच्या पदांचा मुद्दाही हाताळला जात आहे. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर