शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मृत दाखवून मतदानापासून ठेवले वंचित : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:31 IST

जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

ठळक मुद्देचौकशी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिवंत असलेल्या मतदारांना मृत दाखवून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकींमध्ये त्यांना मतदानापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या दिवशी ११ एप्रिल २०१९ ला रामटेक लोकसभा क्षेत्राच्या मतदान केंद्रांना भेटी दिल्या असता मतदानाविषयी बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या. यात प्रामुख्याने जिवंत असलेल्या व्यक्तींना मृत दाखवून मतदार यादीत त्यांच्या नावासमोर (डिलेटेड) असे लिहिले होते. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या जवळ मतदार ओळखपत्र असून सुध्दा मतदानापासुन वंचित राहावे लागले, यात २२ व २३ वर्षाच्या तरुणांचाही समावेश होता हे विशेष. प्रशासनाच्या या चुकीमुळे बऱ्याच मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. त्यामुळे मतदानापासुन वंचित राहिलेल्या लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष दिसून आला.वरील तक्रारीबद्दल योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील येणाऱ्या निवडणुकांमध्ये या वेळेस जिवंत असूनही मृत दाखवल्यामुळे मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना मतदार यादीत योग्य त्या दुरुस्ती करून मतदानापासुन वंचित ठेवू नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त व इतर सहकारी निवडणुक आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, राज्य नियुक्त आयुक्त मुंबई यांना केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकramtek-pcरामटेकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019