शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चळवळीचे तत्त्वज्ञान गीतातून मांडले

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत

नागपूर : आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत जगलेली माणसेच नाहीत, तर येणारी प्रत्येक पिढी वामनदादा याच नावाने संबोधत राहील. एक कुटुंबप्रमुख म्हणून महाकवी वामनदादा कर्डकांनी १९४३ ते २००४ या कालखंडात चळवळीवर ५ हजाराहून अधिक गीते लिहून चळवळीचे तत्त्वज्ञान समाजापुढे मांडले. कर्डक म्हणजे आंबेडकरी चळवळीचा तपशिलवार लेखाजोखाच होते, असे मत वामनदादांच्या लोक गीतांचे गाढे अभ्यासक व चिंतक प्रा. डॉ. सागर जाधव यांनी व्यक्त केले. निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकरी चळवळीत वामनदादांचे योगदान’ या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला मुख्य वक्ते म्हणून प्रा. डॉ. सागर जाधव उपस्थित होते. यावेळी मंचावर अमर रामटेके, इंजि. राहुल दहीकर, शामराव हाडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सागर जाधव यांनी महाकवी वामनदादा यांच्या काव्यांवर पीएच.डी. केली आहे. वामनदादा अशिक्षित माणूस. मात्र बाबासाहेबांच्या कार्याचे प्रचंड आकर्षण. बाबासाहेबांनी सांगितले, आपले सामर्थ्य आणि कर्तृत्व सिद्ध करणारी लेखणी आणि वाणी ही दोन महत्त्वाची शस्त्र आहेत आणि वामनदादांनी तेच लक्षात ठेवले. बाबासाहेबांच्या चळवळीत ते जगले. त्यांनी आंदोलन भोगले आणि यातून त्यांच्या लेखणीला शब्द फुटले. त्यांनी चळवळीच्या विविध अंगावर रचलेली गीत, काव्य आणि गझलेतून चळवळीला अतिशय व्यापक केले. १९५१ च्या नायगावच्या सभेत बाबासाहेबांकडून त्याला शाब्बासकी मिळाली. ही कौतुकाची थाप त्यांना स्फूर्ती देऊन गेली. यातून त्यांनी ५००० गीते रचली. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीचा माणूस बाबासाहेबांनंतर वामनदादांना अभिवादन करतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी काव्यधारेचेही आयोजन करण्यात आले होते. यात अमर रामटेके, जगदीश राऊत, दिगांबर चनकापुरे, प्रकाश कांबळे, सुरेश वंजारी आदींनी काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)