शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:37 IST

दिशादर्शक परिषद

नागपूर : संविधानाच्या घटना समितीमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे कष्ट घेऊन भारतीय संविधान तयार केले. मात्र, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ही घटना मान्य नाही. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल, यासाठी दलित व बहुजन समाज एकत्र आला तरच हे शक्य असल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी मंगळवारी केले.

सिव्हील येथील देशपांडे सभागृहात आयोजित दिशादर्शक परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित आर्थिक लोकशाही या विषयावर अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. व्यासपीठावर दलित पँथरचे संस्थापक आणि लेखक ज. वि. पवार, अर्थशास्त्रज्ञ व लेखक ज्यॉ ड्रीसा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्रगतिशील कार्यकर्ता प्रा. सुषमा भड आदी उपस्थित होते.

फुले, शाहू व आंबेडकर यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाशिवाय लोकशाही मजबूत होणार नाही. परंतु पैसे नाहीत म्हणून केंद्र व राज्य सरकार शिक्षणावर पैसा खर्च करीत नाही. देशातील एक टक्का लोकांकडे ४० टक्के सपत्ती आहे. त्यांच्याकडून काॅर्पोरेट टॅक्स वसूल केला तर २५ ते ३० लाख कोटींचा निधी जमा करणे सहज शक्य आहे. अमेरिकेसह विकसित देशात शिक्षणावर ५० ते ७५ टक्के खर्च केला जातो. आपल्या देशात मात्र सर्वसामान्यांना शिक्षणाचे दारे बंद केली जात आहेत. याविरोधात संघटित होण्याची गरज आहे.

ज. वि. पवार म्हणाले, इतिहासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसू नये, यासाठी रिपब्लिकन पक्षाची नागपुरात पुन्हा स्थापना व्हावी, यात ओबीसी घटकांचा समावेश आसावा. शैक्षणिक धोरण राबविताना नवनवे प्रयोग राबविण्यात आले नाहीत. विशिष्ट वर्गाचा वरचष्मा असलेले धोरण मागील अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. देशातील ओबीसी व दलित एकत्र आले तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

ज्यॉ ड्रीसा म्हणाले, भांडवलशाहीत मजूर हा गुलाम बनतो. त्याचे शोषण केले जाते. कामगारांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून उद्योग सुरू केल्यास देशात आर्थिक लोकशाही येईल, असा विश्वास व्यक्त केला. सुषमा भड यांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याचे सांगितले. मिलिंद पखाले यांनी सरकार शिक्षण व आरोग्यासाठी निधी देत नसल्याची टीका केली. यावेळी डॉ. बी.एस. गेडाम, डॉ. सुरेंद्र बोरकर, जे. एस. शिंदे, दुर्वास चौधरी, जोगेंद्र सरदारे, नरेश वाहाणे, यू. एन. बोरकर, प्रा. प्रगती कुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर