शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:37 IST

दिशादर्शक परिषद

नागपूर : संविधानाच्या घटना समितीमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे कष्ट घेऊन भारतीय संविधान तयार केले. मात्र, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ही घटना मान्य नाही. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल, यासाठी दलित व बहुजन समाज एकत्र आला तरच हे शक्य असल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी मंगळवारी केले.

सिव्हील येथील देशपांडे सभागृहात आयोजित दिशादर्शक परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित आर्थिक लोकशाही या विषयावर अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. व्यासपीठावर दलित पँथरचे संस्थापक आणि लेखक ज. वि. पवार, अर्थशास्त्रज्ञ व लेखक ज्यॉ ड्रीसा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्रगतिशील कार्यकर्ता प्रा. सुषमा भड आदी उपस्थित होते.

फुले, शाहू व आंबेडकर यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाशिवाय लोकशाही मजबूत होणार नाही. परंतु पैसे नाहीत म्हणून केंद्र व राज्य सरकार शिक्षणावर पैसा खर्च करीत नाही. देशातील एक टक्का लोकांकडे ४० टक्के सपत्ती आहे. त्यांच्याकडून काॅर्पोरेट टॅक्स वसूल केला तर २५ ते ३० लाख कोटींचा निधी जमा करणे सहज शक्य आहे. अमेरिकेसह विकसित देशात शिक्षणावर ५० ते ७५ टक्के खर्च केला जातो. आपल्या देशात मात्र सर्वसामान्यांना शिक्षणाचे दारे बंद केली जात आहेत. याविरोधात संघटित होण्याची गरज आहे.

ज. वि. पवार म्हणाले, इतिहासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसू नये, यासाठी रिपब्लिकन पक्षाची नागपुरात पुन्हा स्थापना व्हावी, यात ओबीसी घटकांचा समावेश आसावा. शैक्षणिक धोरण राबविताना नवनवे प्रयोग राबविण्यात आले नाहीत. विशिष्ट वर्गाचा वरचष्मा असलेले धोरण मागील अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. देशातील ओबीसी व दलित एकत्र आले तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

ज्यॉ ड्रीसा म्हणाले, भांडवलशाहीत मजूर हा गुलाम बनतो. त्याचे शोषण केले जाते. कामगारांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून उद्योग सुरू केल्यास देशात आर्थिक लोकशाही येईल, असा विश्वास व्यक्त केला. सुषमा भड यांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याचे सांगितले. मिलिंद पखाले यांनी सरकार शिक्षण व आरोग्यासाठी निधी देत नसल्याची टीका केली. यावेळी डॉ. बी.एस. गेडाम, डॉ. सुरेंद्र बोरकर, जे. एस. शिंदे, दुर्वास चौधरी, जोगेंद्र सरदारे, नरेश वाहाणे, यू. एन. बोरकर, प्रा. प्रगती कुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर