शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल - माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 10:37 IST

दिशादर्शक परिषद

नागपूर : संविधानाच्या घटना समितीमध्ये असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे कष्ट घेऊन भारतीय संविधान तयार केले. मात्र, केंद्रातील सत्ताधाऱ्यांना ही घटना मान्य नाही. केंद्रात सत्ता परिवर्तन झाले तरच देशातील लोकशाही वाचेल, यासाठी दलित व बहुजन समाज एकत्र आला तरच हे शक्य असल्याचे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी मंगळवारी केले.

सिव्हील येथील देशपांडे सभागृहात आयोजित दिशादर्शक परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित आर्थिक लोकशाही या विषयावर अध्यक्षीय भाषणात कोळसे पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. व्यासपीठावर दलित पँथरचे संस्थापक आणि लेखक ज. वि. पवार, अर्थशास्त्रज्ञ व लेखक ज्यॉ ड्रीसा, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पखाले, प्रगतिशील कार्यकर्ता प्रा. सुषमा भड आदी उपस्थित होते.

फुले, शाहू व आंबेडकर यांनी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले. शिक्षणाशिवाय लोकशाही मजबूत होणार नाही. परंतु पैसे नाहीत म्हणून केंद्र व राज्य सरकार शिक्षणावर पैसा खर्च करीत नाही. देशातील एक टक्का लोकांकडे ४० टक्के सपत्ती आहे. त्यांच्याकडून काॅर्पोरेट टॅक्स वसूल केला तर २५ ते ३० लाख कोटींचा निधी जमा करणे सहज शक्य आहे. अमेरिकेसह विकसित देशात शिक्षणावर ५० ते ७५ टक्के खर्च केला जातो. आपल्या देशात मात्र सर्वसामान्यांना शिक्षणाचे दारे बंद केली जात आहेत. याविरोधात संघटित होण्याची गरज आहे.

ज. वि. पवार म्हणाले, इतिहासातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसू नये, यासाठी रिपब्लिकन पक्षाची नागपुरात पुन्हा स्थापना व्हावी, यात ओबीसी घटकांचा समावेश आसावा. शैक्षणिक धोरण राबविताना नवनवे प्रयोग राबविण्यात आले नाहीत. विशिष्ट वर्गाचा वरचष्मा असलेले धोरण मागील अनेक वर्षांपासून राबविले जात आहे. देशातील ओबीसी व दलित एकत्र आले तर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

ज्यॉ ड्रीसा म्हणाले, भांडवलशाहीत मजूर हा गुलाम बनतो. त्याचे शोषण केले जाते. कामगारांनी एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून उद्योग सुरू केल्यास देशात आर्थिक लोकशाही येईल, असा विश्वास व्यक्त केला. सुषमा भड यांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याचे सांगितले. मिलिंद पखाले यांनी सरकार शिक्षण व आरोग्यासाठी निधी देत नसल्याची टीका केली. यावेळी डॉ. बी.एस. गेडाम, डॉ. सुरेंद्र बोरकर, जे. एस. शिंदे, दुर्वास चौधरी, जोगेंद्र सरदारे, नरेश वाहाणे, यू. एन. बोरकर, प्रा. प्रगती कुकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणnagpurनागपूर