शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक म्हणून अधिकार मागा, धर्माच्या नावावर नको - राज्यपाल आरीफ माेहम्मद खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 11:51 IST

मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला

नागपूर : नागरिकांनी संविधान वाचावे, तेव्हाच आपल्या अधिकारांची जाणीव हाेईल. भारत देश कुटुंबाप्रमाणे आहे व या कुटुंबाचा पाया मजबूत आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत. मात्र, त्या अधिकारांची मागणी नागरिक म्हणून करा, धर्माच्या नावावर नव्हे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरीफ माेहम्मद खान यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ, तसेच ह्युमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला आयाेजित करण्यात आली आहे. याअंतर्गत गुरुवारी ‘देशाच्या प्रगतीसाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता व सद्भावनेची गरज’ या विषयावर राज्यपाल आरीफ खान यांनी मार्गदर्शन केले.

राज्यपाल आरीफ खान म्हणाले, संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत आणि प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त आहेत. या देशात काेणत्याही व्यक्तीवर धर्म, जात, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव हाेणार नाही. मात्र, याची जाणीव संविधान वाचल्याशिवाय हाेणार नाही. काेणत्याही देशात नांदणारी शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधार असताे. जिथे शांतता आहे, ताेच देश प्रगती करताे.

आपसात प्रेम आणि बंधुभाव जाेपासल्यानेच शांती प्रस्थापित हाेते. असंताेष निर्माण हाेण्याची अनेक कारणे आहेत. चांगल्यात चांगल्या गाेष्टीचा वाईट उपयाेग केल्यानेही तसे हाेते. धर्म अतिशय पवित्र गाेष्ट असून ती व्यक्ती व समाजाला जाेडते. मात्र, अनेकदा लाेक आपल्या पद्धतीने धर्माची व्याख्या करतात. धर्माचा उपयाेग लाेकांची विभागणी करण्यासाठी हाेऊ नये. एकात्मता हा भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा गुण आहे. इंग्रजांनी ही एकता ताेडण्यासाठी अनेक धाेरणे राबविली. जे लाेक आपल्या इच्छांना नियंत्रित करू शकत नाही, अशा लाेकांपासून दूर राहण्याचे आवाहन राज्यपाल खान यांनी केले.

राज्यपाल म्हणाले..

  • भारत एका कुटुंबाप्रमाणे आहे.
  • देशाच्या संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत.
  • देशाची मूलभूत शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे.
  • आपल्या इच्छांना अनियंत्रित हाेऊ देऊ नका.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, ट्रस्टचे माजीद पारेख, प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, कुलसचिव डाॅ. राजू हिवसे, फोरम फॉर प्रमोटिंग मॉडरेट थॉटचे महासचिव फैज उर रहेमान प्रामुख्याने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. संताेष गिऱ्हे यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकEducationशिक्षणnagpurनागपूर