शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक म्हणून अधिकार मागा, धर्माच्या नावावर नको - राज्यपाल आरीफ माेहम्मद खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 11:51 IST

मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला

नागपूर : नागरिकांनी संविधान वाचावे, तेव्हाच आपल्या अधिकारांची जाणीव हाेईल. भारत देश कुटुंबाप्रमाणे आहे व या कुटुंबाचा पाया मजबूत आहे. संविधानाने तुम्हाला अधिकार दिले आहेत. मात्र, त्या अधिकारांची मागणी नागरिक म्हणून करा, धर्माच्या नावावर नव्हे, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरीफ माेहम्मद खान यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ, तसेच ह्युमॅनिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला आयाेजित करण्यात आली आहे. याअंतर्गत गुरुवारी ‘देशाच्या प्रगतीसाठी विविध धार्मिक समुदायांमध्ये शांतता व सद्भावनेची गरज’ या विषयावर राज्यपाल आरीफ खान यांनी मार्गदर्शन केले.

राज्यपाल आरीफ खान म्हणाले, संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत आणि प्रत्येकाला समान अधिकार प्राप्त आहेत. या देशात काेणत्याही व्यक्तीवर धर्म, जात, संप्रदायाच्या आधारावर भेदभाव हाेणार नाही. मात्र, याची जाणीव संविधान वाचल्याशिवाय हाेणार नाही. काेणत्याही देशात नांदणारी शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधार असताे. जिथे शांतता आहे, ताेच देश प्रगती करताे.

आपसात प्रेम आणि बंधुभाव जाेपासल्यानेच शांती प्रस्थापित हाेते. असंताेष निर्माण हाेण्याची अनेक कारणे आहेत. चांगल्यात चांगल्या गाेष्टीचा वाईट उपयाेग केल्यानेही तसे हाेते. धर्म अतिशय पवित्र गाेष्ट असून ती व्यक्ती व समाजाला जाेडते. मात्र, अनेकदा लाेक आपल्या पद्धतीने धर्माची व्याख्या करतात. धर्माचा उपयाेग लाेकांची विभागणी करण्यासाठी हाेऊ नये. एकात्मता हा भारताच्या संस्कृतीचा महत्त्वाचा गुण आहे. इंग्रजांनी ही एकता ताेडण्यासाठी अनेक धाेरणे राबविली. जे लाेक आपल्या इच्छांना नियंत्रित करू शकत नाही, अशा लाेकांपासून दूर राहण्याचे आवाहन राज्यपाल खान यांनी केले.

राज्यपाल म्हणाले..

  • भारत एका कुटुंबाप्रमाणे आहे.
  • देशाच्या संविधानाने प्रत्येकाचे अधिकार निश्चित केले आहेत.
  • देशाची मूलभूत शांतता ही त्या देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे.
  • आपल्या इच्छांना अनियंत्रित हाेऊ देऊ नका.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, ट्रस्टचे माजीद पारेख, प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, कुलसचिव डाॅ. राजू हिवसे, फोरम फॉर प्रमोटिंग मॉडरेट थॉटचे महासचिव फैज उर रहेमान प्रामुख्याने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे सहायक प्राध्यापक डाॅ. संताेष गिऱ्हे यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकEducationशिक्षणnagpurनागपूर