शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

वसतिगृहाच्या मागणीसाठी ‘कॅम्पस’ला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 23:08 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. याचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडले नसल्यामुळे अनेक नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांचे आंदोलन, प्रशासनाचा मागण्यांना नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मुद्यावरून गुरुवारी अमरावती मार्गावरील ‘कॅम्पस’मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विनापरवानगी विद्यापीठात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीला प्रशासनाने टाळे लावले. याचा विरोध करत विद्यार्थ्यांनी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृह सोडले नसल्यामुळे अनेक नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले ११९ विद्यार्थी राहत आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० एप्रिलला वसतिगृह रिकामे करावे, असे निर्देश विद्यापीठाकडून देण्यात आले होते. मात्र काही जणांच्या परीक्षा बाकी असल्याने विद्यापीठाने ही मुदत १० जूनपर्यंत वाढविली. मात्र तरीदेखील विद्यार्थी निघाले नाहीत. त्यानंतर ही मुदत १० जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तोपर्यंत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे वसतिगृहासाठी अर्ज येण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ११९ विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत खोल्या रिकाम्या करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले. तरीदेखील विद्यार्थ्यांनी खोल्या सोडल्या नाहीत. अखेर नाईलाजाने विनापरवानगी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांना सुरक्षारक्षकांनी टाळे ठोकले.याविरोधात संतप्त विद्यार्थ्यांनी गुरुवारी सकाळी ‘कॅम्पस’च्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यावेळी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्या, मात्र आम्हालाही त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी द्या, अशा मागणीसाठी चक्क विद्यापीठ परिसराचे प्रवेशद्वारच बंद केले. त्यामुळे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची प्रवेशद्वारासमोर मोठी गर्दी जमली होती. अखेर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी धाव घ्यावी लागली.तरच मिळेल वसतिगृहात परत प्रवेशयासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ.येवले व डॉ.खटी यांच्यासमोर मागण्या ठेवल्या. मात्र एकदा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करताना वसतिगृहात राहिलेल्या विद्यार्थ्याला परत दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर नियमानुसार लगेच वसतिगृह देता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्रथम वर्ष प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यानंतर जर काही जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्यांना पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल, असे डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.प्रथम वर्षाचे विद्यार्थी अद्याप प्रतीक्षेतचनागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही नव्याने अनेक प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही जाता आलेले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडलेले नाही. त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांना तेथे जाता आलेले नाही. जुन्यापैकी तर अनेक विद्यार्थी आता तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. काही जण तर नोकरीदेखील करत आहेत. तर काही जण चक्क ‘कॅम्पस’मध्ये तासिका तत्वावर शिकवत आहेत. अशा स्थितीत त्यांना वसतिगृहात रहायला परवानगी दिली तर तो नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. त्यांचादेखील जुन्या विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा, असे मत डॉ. नीरज खटी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन