शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्ली जगात सर्वाधिक प्रदूषित शहर ­­, मुंबई-काेलकाताही यादीत; फुफ्फुसासह मेंदू आणि हृदयावरही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 05:41 IST

रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे.

नवी दिल्ली : हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये राहिल्याने नवी दिल्ली विषारी धुक्याने वेढली गेली आहे. स्वीत्झर्लंडच्या ‘आयक्यूएअर’च्या आकडेवारीनुसार कोलकाता, मुंबईसह भारताची राजधानी जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक ठरली.रविवारी ४८३ च्या एक्यूआयसह नवी दिल्ली पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. वायू प्रदूषणाचा फुफ्फुसांवरच नाही तर सर्व वयोगटातील लोकांच्या हृदय आणि मेंदूसारख्या इतर प्रमुख अवयवांवर देखील परिणाम होतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

नागरिकांना काय होतोय त्रास?कमी तापमान आणि शेजारील राज्यांमध्ये शेतीचा काडीकचरा जाळण्यामुळे हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. नवी दिल्लीच्या २ कोटी रहिवाशांपैकी अनेकांनी डोळ्यात जळजळ होण्याची आणि घशात खाज येण्याची तक्रार केली. 

वायू प्रदूषणाचा गर्भावर विपरित परिणाम...हवेची गुणवत्ता गंभीर राहिल्याने, तज्ज्ञांनी मोठ्या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीचा इशारा देताना गर्भावर दुष्परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील एका हॉस्पिटलचे वरिष्ठ फुफ्फुस विशेषज्ञ डॉ. अरविंद कुमार यांच्या मते, वायू प्रदूषणावर ‘एअर प्युरिफायर’ हा उपाय नाही. जेव्हा गर्भवती महिला श्वास घेते तेव्हा विषारी वायू तिच्या फुफ्फुसात जातो; फुफ्फुसातून तो रक्तात जातो आणि प्लेसेंटाद्वारे गर्भापर्यंत पोहोचतो आणि त्यांच्यावर वाईट परिणाम करताे.”

प्राथमिक शाळा  बंदच राहणारप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. सहावी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

घरून काम करावायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सरकारी आणि खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे, अशी सूचना दिली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण