शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जागतिक बाजारात रासायनिक खताच्या दरात घसरण; भारतात मात्र जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2023 08:00 IST

Nagpur News देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम असून, खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३५० रुपयांनी कमी हाेणे अपेक्षित आहे.

सुनील चरपे

नागपूर : पाच महिन्यांपासून जागतिक पातळीवर रासायनिक खतांच्या दरात घसरण सुरू आहे. फेब्रुवारीमध्ये डीएपीचे दर ६८,८१२ रुपये प्रतिटन हाेते ते आता ४५,३०१ रुपये प्रतिटनावर आले आहेत. युरियाचे दर २६,६२४ रुपये प्रतिटनावरून २५,८०४ रुपये प्रतिटन झाले आहेत. देशात रासायनिक खतांच्या किमती सन २०२१-२२ च्याच कायम असून, खतांचे दर प्रतिबॅग किमान १५० ते ३५० रुपयांनी कमी हाेणे अपेक्षित आहे.

एमओपीचे दर प्रतिटन ४८,३३२ रुपयांवरून ३४,५७० रुपयांवर आले आहेत. भारतात दरवर्षी किमान १०० लाख टन डीएपीचा वापर केला जात असून, ६० लाख टन डीएपी आयात केले जाते. युरियाचा वापर किमान १०० लाख टन आहे. एमओपीचा वापर २६ लाख टन असून, २५ लाख टन एमओपी आयात केले जाते. एनपीके मिश्र खतांचा वापर ११५ लाख टन असता तरी १२ ते १४ लाख टन मिश्र खते आयात केली जातात.

युरियाच्या उत्पादनात अमाेनिया वायूचा वापर केला जाताे. पूर्वी अमाेनियाचे दर ९८,३०४ रुपये प्रतिटन हाेते. तेही आता घसरले आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अमाेनिया वायूचे दर ३०,७२० रुपये प्रतिटन झाले आहेत. डीएपीच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या फाॅस्फरिक ॲसिडचे दर प्रतिटन १,२०८१७ रुपयांवरून ८६,०१६ रुपयांवर आले आहेत. परिणामी, जागतिक बाजारात रासायनिक खते आणि ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे दर कमी हाेत असल्याने भारतात सर्वच रासायनिक खतांचे दर कमी व्हायला हवे, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

रासायनिक खतांचे सध्याचे दर (रुपये-प्रतिबॅग)

डीएपी - १,३५०

एसएसपी - ५५०

युरिया - २६६

१०:२६:२६ - १,४७०

२०:२०:००:१३ - १,२५०

१५:१५:१५ - १,४७०

 

रासायनिक खतांवरील सबसिडी (रुपये-प्रतिटन)

डीएपी - ४८,०००

एमओपी - १८,०००

एसएसपी - ८,०००

युरिया - ५४,०००

चार महिन्यांपासून पाेटॅशचा तुटवडा

देशात चार महिन्यांपासून एमओपी (म्युरेट ऑफ पाेटॅश)ची आयात करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन महिन्यांपासून पाेटॅश मिळेनासे झाले आहे, अशी माहिती केळी उत्पादकांनी दिली असून, याला ‘माफदा’च्या पदाधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. पाेटॅशच्या कमतरतेमुळे केळीसह इतर पिकांचा दर्जा खालावताे. मात्र, यावर कुणीही बाेलायला तयार नाही.

 

आधी अतिमुसळधार पाऊस तर आता अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. सध्या रासायनिक खतांच्या कच्च्या मालाचे दर कमी हाेत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. साेबतच खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

- विनाेद तराळ, अध्यक्ष,

महाराष्ट्र फर्टिलायझर, पेस्टिसाईट्स, सीड्स डिलर्स असाेसिएशन (माफदा).

टॅग्स :agricultureशेती