शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गटनेत्यासह प्रदेशाध्यक्ष निर्णयही लांबणीवर? चेन्नीथला यांची आमदार, पराभूत उमेदवारांशी चर्चा

By कमलेश वानखेडे | Updated: December 18, 2024 08:14 IST

रमेश चेन्नीथला यांनी आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली.

कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधानसभेतील काँग्रेस गटनेतेपदी कुणाला संधी द्यावी, प्रदेशाध्यक्ष बदलावा की कायम ठेवावा, याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसचे विधानसभा व विधान परिषदेतील आमदार तसेच पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. काही आमदारांनी आपले मत स्पष्टपणे नोंदविले, तर काहींनी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल, असे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी गटनेत्याची नियुक्ती होण्याची शक्यता नाही, तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णयही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ७च्या सुमारास रमेश चेन्नीथला दाखल झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, आरिफ नसीम खान, यशोमती ठाकूर, भाई जगताप, विकास ठाकरे आदी उपस्थित होते. चेन्नीथला यांनी एका रूममध्ये आमदार व पराभूत उमेदवारांशी 'वन टू वन' चर्चा केली. विधानसभेतील १६ पैकी १५ आमदार तर परिषदेतील ८ पैकी ७ आमदार आणि पराभूत ४७ उमेदवारांनीही चेन्नीथला यांची भेट घेतली. या भेटीत विधानसभेच्या आमदारांना गटनेते पदाबाबत नाव सुचविण्यास सांगण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष बदलवायचा की नाही, नवा चेहरा कोण असू शकतो, अशीही विचारणा करण्यात आली. आमदारांनी व्यक्त केलेली मते चेन्नीथला यांनी नोंदवून घेतली. पराभूत उमेदवारांनाही प्रदेशाध्यक्षाबाबत विचारणा करण्यात आली. या चर्चेत मांडण्यात आलेल्या मतांचा अहवाल चेन्नीथला हे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपविणार आहेत. यानंतर गटनेतेपदाचा निर्णय दिल्लीतून कळविला जाईल, तर प्रदेशाध्यक्षांबाबतचा निर्णय घ्यायला काही कालावधी लागेल, असे काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

ईव्हीएमवर परस्परविरोधी मते 

चेन्नीथला यांनी सर्वच पराभूत उमेदवारांना ईव्हीएमचा दोष वाटतो का, अशी विचारणा केली. त्यावर बहुसंख्य उमेदवारांनी बूथची आकडेवारी सांगत ईव्हीएमचा घोळ असल्याचा दावा केला तर काही उमेदवारांनी ईव्हीएमवर नारळ फोडणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढलाच नाही, अशी रोखठोक भूमिकाही मांडली. 

टॅग्स :congressकाँग्रेस