शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

प्रतिवादी नसताना वादावर निर्णय अवैधच : हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:07 IST

Nagpur : वादग्रस्त निर्णय रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणत्याही वादाच्या प्रकरणामध्ये आवश्यक प्रतिवादींचा समावेश केला गेला नसल्यास त्यावर दिलेला निर्णय अवैध ठरतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांनी स्पष्ट केले. तसेच, संबंधित वादग्रस्त निर्णय रद्द केले.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यामधील सुवर्णा टोंगे व इतर पाच शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करून रणजित बोढाले व इतर तीन शेतकऱ्यांनी शेतात जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा निर्माण केला, असा आरोप केला होता.

त्या तक्रारीत आशा बोढाले व इतर काही शेतकऱ्यांनाही प्रतिवादी करणे आवश्यक होते. परंतु, त्यांना प्रतिवादी केले गेले नाही. तहसीलदारांनी या त्रुटीकडे दुर्लक्ष करून १३ सप्टेंबर २०२३ रोजी रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचा आदेश दिला. ११ जून २०२४ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश कायम ठेवला. परिणामी, आशा बोढाले व इतरांनी या दोन्ही निर्णयांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने संबंधित त्रुटी लक्षात घेता याचिका मंजूर केली.

फेरनिर्णयाचा आदेशउच्च न्यायालयाने हे प्रकरण तहसीलदारांकडे परत पाठविले आणि आशा बोढालेसह इतर आवश्यक प्रतिवादींना सुनावणीची संधी देऊन प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. एस. ओ. अहमद यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय