शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बोगस आदिवासींच्या फायद्याचा निर्णय रद्द : राज्य शासनाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:45 IST

अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला आहे. त्यामुळे शासन व बोगस आदिवासींना जोरदार दणका बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रशासनावर व्यापक परिणाम होणार आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला आहे. त्यामुळे शासन व बोगस आदिवासींना जोरदार दणका बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रशासनावर व्यापक परिणाम होणार आहेत.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांनी हा निर्वाळा दिला. शासनाने २१ आॅक्टोबर २०१५ रोजी हा वादग्रस्त निर्णय जारी केला होता. त्याद्वारे, १५ जून १९९५ ते १७ आॅक्टोबर २००१ या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी त्यांचा जात वैधतेचा दावा खारीज झाल्यावरही सुरक्षित करण्यात आली होती. त्याविरुद्ध आॅर्गनायझेशन फॉर राईट आॅफ ट्रायबल्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, त्यांनी उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचा ‘एफसीआय वि. जगदीश बहिरा’ प्रकरणातील निर्णय सादर केला होता. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिल्यास राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन होते असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता २१ आॅक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयातील वादग्रस्त भाग अवैध ठरवून रद्द केला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर