शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

बोगस आदिवासींच्या फायद्याचा निर्णय रद्द : राज्य शासनाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:45 IST

अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला आहे. त्यामुळे शासन व बोगस आदिवासींना जोरदार दणका बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रशासनावर व्यापक परिणाम होणार आहेत.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्वाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जमाती प्रवर्गातील जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतरही कर्मचाऱ्यांची नोकरी सुरक्षित ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला आहे. त्यामुळे शासन व बोगस आदिवासींना जोरदार दणका बसला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे प्रशासनावर व्यापक परिणाम होणार आहेत.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांनी हा निर्वाळा दिला. शासनाने २१ आॅक्टोबर २०१५ रोजी हा वादग्रस्त निर्णय जारी केला होता. त्याद्वारे, १५ जून १९९५ ते १७ आॅक्टोबर २००१ या कालावधीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी त्यांचा जात वैधतेचा दावा खारीज झाल्यावरही सुरक्षित करण्यात आली होती. त्याविरुद्ध आॅर्गनायझेशन फॉर राईट आॅफ ट्रायबल्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, त्यांनी उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचा ‘एफसीआय वि. जगदीश बहिरा’ प्रकरणातील निर्णय सादर केला होता. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने जात वैधतेचा दावा अवैध ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीत संरक्षण दिल्यास राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन होते असे म्हटले आहे. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता २१ आॅक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयातील वादग्रस्त भाग अवैध ठरवून रद्द केला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर