शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 20:43 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा जाहीर केलेला पुढचा टप्पा लवकर देण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री जयंत पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.विरोधकांच्या कांगाव्याबद्दल ते म्हणाले, सरकार नवीन आहे. आता कुठे कामकाज हाती घेतले आहे. नवीन सरकारला कामकाज करण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, हे त्यांनी समजून घ्यावे. त्यांना आम्हीही त्यासाठी वेळ दिला होता. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे सभागृहात दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.नागरिकत्व संशोधन विधेयक सादर झाल्यापासून देशातील वातावरण बदलले आहे. पाच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. अनेक मंचावरून आणि अनेक भागांतून या विरोधात मते मांडली जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात दिल्लीमध्ये भूमिका स्पष्ट केली. पक्षाचीही हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मिळून ठरवतील, त्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील. अधिवेशनानंतर खातेवाटपासंदर्भात स्पष्टता होईल.स्थानिक पातळीवर महाआघाडीलवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे. वर्षभरात त्याचा अनुभव कसा राहतो, त्यावरून स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल दिसेल. मात्र स्थानिक कार्यर्त्यांचीही भूमिका यात महत्त्वाची असल्याने त्याचाही विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी