शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कर्जमाफीचा निर्णय होणार, पण योग्य वेळी : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 20:43 IST

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देसरकार शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेवर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द सरकारने दिला आहे. त्यानुसार निर्णय होईलच. पण नक्की कधी हे आपण आज सांगू शकत नाही. मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असलेल्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केले.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा जाहीर केलेला पुढचा टप्पा लवकर देण्याच्या दृष्टीने वित्तमंत्री जयंत पाटील यांनी तयारी सुरू केली आहे.विरोधकांच्या कांगाव्याबद्दल ते म्हणाले, सरकार नवीन आहे. आता कुठे कामकाज हाती घेतले आहे. नवीन सरकारला कामकाज करण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, हे त्यांनी समजून घ्यावे. त्यांना आम्हीही त्यासाठी वेळ दिला होता. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे सभागृहात दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे.नागरिकत्व संशोधन विधेयक सादर झाल्यापासून देशातील वातावरण बदलले आहे. पाच राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला आहे. अनेक मंचावरून आणि अनेक भागांतून या विरोधात मते मांडली जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यासंदर्भात दिल्लीमध्ये भूमिका स्पष्ट केली. पक्षाचीही हीच भूमिका असल्याचे ते म्हणाले.राज्य मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मिळून ठरवतील, त्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी निर्णय घेतील. अधिवेशनानंतर खातेवाटपासंदर्भात स्पष्टता होईल.स्थानिक पातळीवर महाआघाडीलवकरच पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आहे. वर्षभरात त्याचा अनुभव कसा राहतो, त्यावरून स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीच्या प्रयोगाबद्दल दिसेल. मात्र स्थानिक कार्यर्त्यांचीही भूमिका यात महत्त्वाची असल्याने त्याचाही विचार करावा लागेल, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी