शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धावत्या रेल्वेत चढताना मृत्यू, कुटुंबाला ८ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 06:52 IST

संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धावत्या रेल्वेमध्ये चढताना खाली पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे पीडित पत्नी, मुलगी व दोन मुलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली व ही रक्कम चार महिन्यांत अदा करण्याचे निर्देश मध्य रेल्वेला दिले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. गौतम पाटील असे मृताचे नाव असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवासी होते.       

संबंधित रेल्वेचा बुटीबोरीमध्ये पाच मिनिटांचा थांबा होता, पण मार्ग मोकळा नसल्यामुळे ती रेल्वे एक तास खोळंबली. प्रशासनाने रेल्वे विलंबाचे कारण व रेल्वे कधी सुटेल याची माहिती प्रवाशांना दिली नाही. रेल्वे अचानक सुरू झाल्याने पाटील यांची ताळांबळ उडाली. त्यामुळे  अपघाताकरिता रेल्वेही जबाबदार आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले.

काय घडले होते? nपाटील हे कुटुंबीयांसह तुळजापूरला गेले होते. ते १० जून २०११ रोजी परतीच्या प्रवासाकरिता भुसावळ-नागपूर पॅसेंजरमध्ये बसले होते.nरेल्वे बुटीबोरीला थांबल्यानंतर ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी खाली उतरले होते. रेल्वे अचानक सुरू झाली. ते रेल्वेत चढताना खाली पडून मरण पावले. 

आधी दावा नामंजूर पाटील यांच्या कुटुंबीयांकडून भरपाई मिळावी या मागणीसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, रेल्वेमध्ये चढताना झालेल्या अपघाताकरिता पाटील स्वत: कारणीभूत असल्याचे कारण देत दावा नामंजूर केला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. 

टॅग्स :railwayरेल्वे