शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नागपुरात ई-रिक्षाखाली दबून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 21:30 IST

रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाचपावलीतील घटना : नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्याच्या काठाने खेळत असलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा ई-रिक्षाखाली दबून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पसरला आहे.लव पप्पू बदरोटिया असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. लवचे वडील पप्पू बाजारात फिरून लहान-मोठ्या घरगुती वापराच्या वस्तूंची विक्री करतात. गुरुवारी दुपारी ३ वाजता पप्पूची पत्नी पिंकी घरासमोरील रस्त्याच्या काठावर बसली होती. जवळच लवही खेळत होता. त्याचवेळी ई-रिक्षाचालक रामराव हेडाऊ तेथून रिक्षा घेऊन गेला. असे सांगितले जाते की, हेडाऊ नशेत होता. त्याने निष्काळजीपणे उजव्या बाजूला पलटताना रिक्षा फिरवला. त्याचवेळी तो पलटला. रस्त्याच्या बाजूला खेळत असलेला लव त्याखाली दबला. चिमुकल्या लवचे डोके ई-रिक्षाच्या सळाखीखाली आले. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. त्यांनी पाचपावली पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी हेडाऊला ताब्यात घेतले.नागरिकांनी या अपघातासाठी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. नागरिकांनी सांगितले की, २०१३ मध्ये नाईक तलाव मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यामुळे खांब रस्त्याच्या मध्ये आले. ते हटविण्यात आले नाही. घटनास्थळी सुद्धा रस्त्याच्या मध्ये विजेचा खांब आहे. या खांबामुळेच वाहनचालकांना त्रास होतो. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. वाहनांची गतीही अधिक असते. घटनास्थळाजवळच महात्मा ज्योतिबा हायस्कूल आहे. या शाळेतील मुलांना नेहमीच अपघाताचा धोका असतो.नागरिकांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि मनपा अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना येथे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली. तसेच रस्त्याच्या मध्ये आलेले खांब हटविण्याची मागणी केली. परंतु कुणीही ऐकले नाही. नागरिकांनी दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यांनी लवच्या वडिलांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली.नशेत होता चालकनाईक तलाव परिसर हा गरीब व मजूर वर्गांची वस्ती आहे. येथे अवैध दारूचे अनेक अड्डे आहेत. ते सर्रास चालतात. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती आहे. असे सांगितले जाते की, ई-रिक्षाचालक हेडाऊ हा सुद्धा अवैध दारूच्या अड्ड्यावरूनच परतत होता. नशेत असल्याने त्याने रिक्षावरील नियंत्रण सुटले.यापूर्वीही झाले अपघातयाच ठिकाणी तीन दिवसापूर्वीच बाईकच्या धडकेत एक मुलगा थोडक्यात बजावला. दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी सन्नी राजू इरपाचे शाळेतून बाहेर येत होता. त्याचवेळी बाईकने त्याला धडक दिली. यात तो जखमी झाला. या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे पालक व शिक्षकही दहशतीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू