शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भारत-बांगलादेश क्रिकेट सामना दरम्यान कर्तव्यावरील सहायक फौजदाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:58 IST

भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देहृदयविकाराचा धक्का जामठा परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या बंदोबस्तासाठी जामठा मैदान परिसरात तैनात असलेले सहायक फौजदार (एएसआय) मदार शेख यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.मदार शेख पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी भारत-बांगलादेश दरम्यान जामठा येथे एकदिवसीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. त्याच्या बंदोबस्तासाठी सकाळपासूनच पोलीस तैनात करण्यात आले होते. एएसआय मदार शेख हेदेखील सहकाऱ्यांसह जामठा येथे बंदोबस्तासाठी गेले होते. दुपारी १२ च्या सुमारास वरिष्ठ पोलीस अधिकारी कुणाची कुठे तैनाती द्यायची, याबाबत चर्चा करीत होते. त्यावेळी मदार शेख स्टेडियमच्या जवळ लावलेल्या पेंडालमध्ये कर्तव्यावर होते. अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यामुळे सहकारी पोलिसांनी त्यांना पाणी देऊन विचारणा केली.छाती दुखत असल्याचे सांगितल्यामुळे त्यांना जामठा येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मदार शेख यांच्या मृत्यूची वार्ता कळताच पोलीस दलात शोककळा निर्माण झाली.एक उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून मदार शेख यांची शहरातील क्रीडा क्षेत्रात ओळख होती. ते न्यू ताज क्रीडा मंडळाचे खेळाडू अन् मार्गदर्शक म्हणूूनही ओळखले जायचे. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सलग बंदोबस्त, सारखा ताण !गेल्या सहा महिन्यांपासून शहर पोलीस सलग बंदोबस्तावर आहे. आधी सणोत्सव, नंतर निवडणुका, त्यानंतर निकाल अन् आता अयोध्या निकाल, तो आटोपत नाही तर क्रिकेट सामन्याचा बंदोबस्त. सारख्यासारख्या बंदोबस्तामुळे पोलिसांवरील ताण कमालीचा वाढला आहे. कर्तव्यामुळे आधीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना हक्काच्या सुट्यांवरही गदा आल्याने पोलीस नाकतोंड दाबून बुक्क्याचा मार खावा, अशा अवस्थेत कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू