शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 11:44 IST

राजनगरमधील घटना : विजेचा धक्का की विषारी वायूमुळे श्वास गुदमरला?

नागपूर : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजनगरमधील स्टेट बँक कॉलनीत विहीर स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या दोन तरुण मजुरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. अमन रतनलाल मरकाम (२२) आणि शंकर अर्जुन उईके (२२), अशी मृत मजुरांची नावे असून, ते सिद्धार्थनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी होते. या दोघांचा मृत्यू विहिरीतील विषारी वायूमुळे श्वास गुदमरल्याने झाला की पाण्याच्या मोटारीतून विजेचा धक्का लागला ही बाब स्पष्ट होऊ शकलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

प्लॉट क्र. १५ रहिवासी डॉ. सुनील नरसिंह राव यांच्या अंगणात असलेली विहीर स्वच्छ करण्यासाठी दोन्ही मजुरांना बोलाविण्यात आले होते. सुरुवातीला अमन साफसफाईसाठी ५५ फूट खोल विहिरीत उतरला, तर शंकर विहिरीबाहेर उभा होता. दरम्यान, काही वेळातच अमन बेशुद्धावस्थेत विहिरीत खाली पडला. हे पाहून शंकर अमनला वाचविण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र, तोदेखील बेशुद्ध होऊन पाण्यात पडला. ही बाब समजताच स्थानिकांनी सदर पोलिस व अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी हुकच्या साहाय्याने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर दोघांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केले. तक्रारदार किशोर उईके यांच्या फिर्यादीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मृत्यू नेमका कशाने ?

या घटनेची माहिती मिळताच अमन व शंकरचे नातेवाईक मोठ्या संख्येने राजनगरमध्ये पोहोचले. विहिरीत उतरल्यानंतर दोघांनी बराच वेळ आतून गाळ बाहेर काढला. मात्र, इतक्यात कुणीतरी विहिरीत लावलेली मोटार सुरू केली. त्यामुळे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. या दोघांचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर