शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू एके ठिकाणी, आंदोलन दुसऱ्या ठिकाणी ! वडिलांनी पोलिसांना खोटी माहिती का दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:01 IST

मृताच्या वडिलांनी केली होती खोटी तक्रार : सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिप्टी सिग्नल परिसरात मोटारसायकस्वार तरुणाचा खड्यात पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले होते. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांकडून तडकाफडकी रेल्वे, तसेच मनपा कंत्राटदाराविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी अपघाताची सीसीटीव्हीच्या माध्यमातून चौकशी केली असता भलताच प्रकार समोर आला. संबंधित तरुणाचा पारडी उड्डाणपुलावर अपघात झाला होता व त्याच्या वडिलांनी डिप्टी सिग्नल पुलाखाली घसरून अपघात झाल्याची खोटी तक्रार केली होती. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी तक्रार आली म्हणून तिची शहानिशा न करता गुन्हा नोंदविण्यात कसा काय आला, असा सवाल उपस्थित होत आहे.

महेंद्र संतकुमार फिंग (२४, जुना बाजार चौक, डिप्टी सिग्नल), असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील संतकुमार फटिंग यांच्या तक्रारीनुसार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:४० वाजता तो स्मॉल फॅक्टरी एरियातील त्याच्या बी. डी. आयर्न स्टील कंपनीतून काम आटोपून एमएच ४९-सीपी ५७४२ या क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी निघाला होता.

डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगच्या नवीन पुलाच्या पोल क्रमांक ४ जवळून जात असताना तेथील खड्ड्यात पाणी साचले होते. खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह त्यात पडला. त्याच्या डोके, पोटाला मार लागून तो गंभीर जखमी झाला व त्याचा त्यानंतर मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र, लकडगंज पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधित अपघात पारडी उड्डाणपुलावर झाल्याची बाब समोर आली. महेंद्रने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह व मोटारसायकल रामदेवबाबा इस्पितळात नेण्यात आले होते. पोलिसांनी साक्षीदारांनादेखील विचारणा केली; परंतु वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांनी आंदोलन केल्याचेदेखील स्पष्ट झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार, साईनाथ रामोड, संदीप शिंदे, महेश जाधव, हितेश राठोड, प्रभाकर मानकर, प्रदीप गेडाम, सूरज मडावी यांच्या पथकाने हा तपास केला.

योग्य तपास करून करायला हवी होती कारवाई?

संबंधित अपघातानंतर डिप्टी सिग्नलच्या पुलाखाली तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागली होती. प्रकरण गंभीर होते. त्यामुळे योग्य तपास होऊन गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते; परंतु पोलिसांनी घाईघाईत गुन्हा दाखल केला व जेथे अपघातच झाला नाही तेथील कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या वडिलांच्या दाव्याची प्राथमिक शहानिशादेखील करण्याची तसदी पोलिसांनी का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात लकडगंज पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

महापालिकेने आता तरी धडा घ्यावा

दरम्यान, डिप्टी सिग्नल येथे अपघात झाला नसला तरी तेथील दुरवस्था व कामाच्या नावावर सुरू असलेली मनमानी समोर आली आहे. नागपुरात केवळ डिप्टी सिग्नलच नव्हे तर अनेक ठिकाणी कामाचे साहित्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त असणे, कंत्राटदारांकडून बॅरिकेड्स न लावणे असे प्रकार दिसून येतात. यातून नेहमी गंभीर अपघाताचा धोका असतो. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी धडा घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात