शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

मृत्यू एके ठिकाणी, आंदोलन दुसऱ्या ठिकाणी ! वडिलांनी पोलिसांना खोटी माहिती का दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:01 IST

मृताच्या वडिलांनी केली होती खोटी तक्रार : सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिप्टी सिग्नल परिसरात मोटारसायकस्वार तरुणाचा खड्यात पडल्याने मृत्यू झाल्याच्या प्रकरणामुळे राजकारण तापले होते. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांकडून तडकाफडकी रेल्वे, तसेच मनपा कंत्राटदाराविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांनी अपघाताची सीसीटीव्हीच्या माध्यमातून चौकशी केली असता भलताच प्रकार समोर आला. संबंधित तरुणाचा पारडी उड्डाणपुलावर अपघात झाला होता व त्याच्या वडिलांनी डिप्टी सिग्नल पुलाखाली घसरून अपघात झाल्याची खोटी तक्रार केली होती. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी तक्रार आली म्हणून तिची शहानिशा न करता गुन्हा नोंदविण्यात कसा काय आला, असा सवाल उपस्थित होत आहे.

महेंद्र संतकुमार फिंग (२४, जुना बाजार चौक, डिप्टी सिग्नल), असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील संतकुमार फटिंग यांच्या तक्रारीनुसार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:४० वाजता तो स्मॉल फॅक्टरी एरियातील त्याच्या बी. डी. आयर्न स्टील कंपनीतून काम आटोपून एमएच ४९-सीपी ५७४२ या क्रमांकाच्या मोटारसायकलने घरी निघाला होता.

डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगच्या नवीन पुलाच्या पोल क्रमांक ४ जवळून जात असताना तेथील खड्ड्यात पाणी साचले होते. खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह त्यात पडला. त्याच्या डोके, पोटाला मार लागून तो गंभीर जखमी झाला व त्याचा त्यानंतर मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हादेखील दाखल केला होता. मात्र, लकडगंज पोलिस ठाण्याच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधित अपघात पारडी उड्डाणपुलावर झाल्याची बाब समोर आली. महेंद्रने समोरच्या वाहनाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह व मोटारसायकल रामदेवबाबा इस्पितळात नेण्यात आले होते. पोलिसांनी साक्षीदारांनादेखील विचारणा केली; परंतु वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीच्या आधारे नागरिकांनी आंदोलन केल्याचेदेखील स्पष्ट झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत चांदेवार, साईनाथ रामोड, संदीप शिंदे, महेश जाधव, हितेश राठोड, प्रभाकर मानकर, प्रदीप गेडाम, सूरज मडावी यांच्या पथकाने हा तपास केला.

योग्य तपास करून करायला हवी होती कारवाई?

संबंधित अपघातानंतर डिप्टी सिग्नलच्या पुलाखाली तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना तेथे धाव घ्यावी लागली होती. प्रकरण गंभीर होते. त्यामुळे योग्य तपास होऊन गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते; परंतु पोलिसांनी घाईघाईत गुन्हा दाखल केला व जेथे अपघातच झाला नाही तेथील कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या वडिलांच्या दाव्याची प्राथमिक शहानिशादेखील करण्याची तसदी पोलिसांनी का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात लकडगंज पोलिस ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

महापालिकेने आता तरी धडा घ्यावा

दरम्यान, डिप्टी सिग्नल येथे अपघात झाला नसला तरी तेथील दुरवस्था व कामाच्या नावावर सुरू असलेली मनमानी समोर आली आहे. नागपुरात केवळ डिप्टी सिग्नलच नव्हे तर अनेक ठिकाणी कामाचे साहित्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त असणे, कंत्राटदारांकडून बॅरिकेड्स न लावणे असे प्रकार दिसून येतात. यातून नेहमी गंभीर अपघाताचा धोका असतो. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आता तरी धडा घेण्याची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात