शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:26 IST

शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमासोद शिवारात प्रचंड दहशत : गुरांना पाणी पाजत असताना चढवला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोंढाळी) : शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.विठोबा दसरू वडुले (६२, रा. धानोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची धानोली शिवारात अडीच एकर शेती असल्याने ते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान, ते गुरांना पाणी पाजत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ते दुपारपर्यंत घरी परत न असल्याने मुलगा शेषराव यांनी शेत गाठले. ते शेतात दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चपला व रक्त जमिनीवर पडले असल्याचे आढळून आले. त्या आधारे त्यांनी शोध घेतला असता, विठोबा यांचा मृतदेह उंबरविहिरीत परिसरातील जंगलात आढळून आला.माहिती मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक गवई, सहायक उपवन संरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने विठोबा यांच्या मानेचा लचका तोडल्याचेही आढळून आले. त्याने विठोबा यांना धानोली शिवारातून उंबरविहिरीच्या जंगलात फरफटत आणल्याचेही स्पष्ट झाले. हा परिसर काटोल तालुक्यालगत असल्याने वाघाचा या तालुक्यातील मासोद, कोंढाळी परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातही वाघाची दहशत निर्माण झाली आहे.जंगलात पाण्याची टंचाईउंबरविहिरी परिसर हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक - ४९ अंतर्गत येतो. या परिसरात अडीच वर्षीय पिंकी नामक वाघिण व युवराज नामक वाघाचा वावर आहे. विठोबा यांच्यावर नेमका कोणत्या वाघाने हल्ला चढविला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अभयारण्याच्या या भागातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले असून, कृत्रिम पाणवठ्यांमध्येही प्यायला पाणी मिळत नसल्याने या वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात त्यांचा मोर्चा शेत व नागरी वस्त्यांकडे वळविला आहे. शिवाय, पिंकी व युवराजचा मासोद, घोटीवाडा व कोंढाळी परिसरात मुक्त संचार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूFarmerशेतकरी