शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नागपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 20:26 IST

शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमासोद शिवारात प्रचंड दहशत : गुरांना पाणी पाजत असताना चढवला हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोंढाळी) : शेतात गुरांना पाणी पाजत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला चढविला. त्यात त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना (धानोली, ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा) शिवारात सोमवारी सकाळी घडली असून, हा परिसर मासोद (ता. काटोल) लगत असल्याने या भागात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.विठोबा दसरू वडुले (६२, रा. धानोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची धानोली शिवारात अडीच एकर शेती असल्याने ते सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान, ते गुरांना पाणी पाजत असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ते दुपारपर्यंत घरी परत न असल्याने मुलगा शेषराव यांनी शेत गाठले. ते शेतात दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात त्यांना चपला व रक्त जमिनीवर पडले असल्याचे आढळून आले. त्या आधारे त्यांनी शोध घेतला असता, विठोबा यांचा मृतदेह उंबरविहिरीत परिसरातील जंगलात आढळून आला.माहिती मिळताच बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक गवई, सहायक उपवन संरक्षक गजानन बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाघाने विठोबा यांच्या मानेचा लचका तोडल्याचेही आढळून आले. त्याने विठोबा यांना धानोली शिवारातून उंबरविहिरीच्या जंगलात फरफटत आणल्याचेही स्पष्ट झाले. हा परिसर काटोल तालुक्यालगत असल्याने वाघाचा या तालुक्यातील मासोद, कोंढाळी परिसरात वावर वाढला आहे. त्यामुळे या भागातही वाघाची दहशत निर्माण झाली आहे.जंगलात पाण्याची टंचाईउंबरविहिरी परिसर हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कक्ष क्रमांक - ४९ अंतर्गत येतो. या परिसरात अडीच वर्षीय पिंकी नामक वाघिण व युवराज नामक वाघाचा वावर आहे. विठोबा यांच्यावर नेमका कोणत्या वाघाने हल्ला चढविला, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. अभयारण्याच्या या भागातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडले असून, कृत्रिम पाणवठ्यांमध्येही प्यायला पाणी मिळत नसल्याने या वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात त्यांचा मोर्चा शेत व नागरी वस्त्यांकडे वळविला आहे. शिवाय, पिंकी व युवराजचा मासोद, घोटीवाडा व कोंढाळी परिसरात मुक्त संचार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूFarmerशेतकरी