शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 22:30 IST

जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले.

ठळक मुद्देदूरवर ओढत नेले, जीव बचावला : पालकांमध्ये पसरली दहशत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात कुत्र्यांचा हैदोस प्रचंड वाढला असून दररोज वाहनचालकांना रस्त्यावर कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्याचा सामना करावा लागतो. जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील अशी धक्कादायक घटना घडली. या भागात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. लोकांचे लक्ष गेले नसते तर दुर्दैवी घटना घडली असती. चिमुकल्याचा जीव बचावला पण या घटनेने पालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

भांगे ले-आऊट, जयताळा येथील शैलेश कोरडे यांचा ७ वर्षीय मुलगा सिद्धेश शेजारच्या दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेला होता. दुकानातून परत येताना अचानक एका कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. अचानक कुत्रा अंगावर आल्याने प्रचंड घाबरलेला सिद्धेश पळायला लागला. यावेळी तेथे असलेल्या इतर चार कुत्रे सिद्धेशच्या अंगावर धावले. शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्याच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला. हातात काठी घेउन नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले व सिद्धेशला त्याच्या घरी सोडले. वडील शैलेश कोरडे यांनी तात्काळ खासगी रुग्णालयात व नंतर मेयो रुग्णालयात उपचार सुरू केला. सिद्धेशचा जीव थोडक्यात बचावला, मात्र पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे आणि संतापही व्यक्त करण्यात येत आहे. लोक धावले नसते तर आज एक दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या सुट्या असल्याने मुले त्यांच्या परिसरात गल्ल्यांमध्ये खेळत असतात. अशावेळी या कुत्र्यांनी पालकांची चिंता वाढविली आहे. मनपा प्रशासनाने मोकाट श्वानांना पकडावे किंवा त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.खरतर शहरात गल्लोगल्लीत फिरणारे श्वान ही मोठी समस्या झाली आहे. रात्री अपरात्री रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांवर हे कुत्रे एकत्रितपणे हल्ला करतात. या भीतीमुळे अनेकदा तोल जाउन धोका होतो. दररोज अशाप्रकारे दुर्घटना समोर येत आहेत. काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे आजाराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी लोकांकडून दररोज होते. सिद्धेश कोरडे या चिमुकल्याच्या घटनेमुळे प्रशासन ही समस्या गंभीरतेने घेईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर