शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात वकिलांवरील हल्ल्याचा 'डीबीए'द्वारे शांततेच्या मार्गाने निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 22:39 IST

नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)च्या वतीने बुधवारी शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देपोलिसांना दिले गुलाबपुष्प : काळ्या कोटांना लावल्या लाल फिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)च्या वतीने बुधवारी शांततेच्या मार्गाने निषेध करण्यात आला.जिल्हा व सत्र न्यायालयातील शेकडो वकिलांनी काळ्या कोटावर लाल फिती लावून काम केले. तसेच, दुपारी २ वाजता न्यायालयापुढे गोळा होऊन हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, महासचिव अ‍ॅड. नितीन देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनी न्यायालय सुरक्षा यंत्रणेतील पोलिसांना गुलाबपुष्प देऊन बंधूभाव कायम ठेवण्याचे आवाहन केले. यावर्षी देशात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांनी देशाला अहिंसेचा संदेश दिला होता. त्या मार्गावर देशाने वाटचाल करायला हवी. हिंसा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही, असे अ‍ॅड. सतुजा यांनी यावेळी बोलताना सांगितले.आंदोलनात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाचे सदस्य पारिजात पांडे, संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश जयस्वाल, विवेक कराडे, कीर्ती कडू, शबाना खान, पारुल शेंद्रे, विनोद खोबरे, विलास राऊत, रोशन बागडे, वासुदेव कापसे, कैलाश दोडानी, उमा अग्रवाल, अजय निकोसे, प्रेम रामटेके, अर्पणा काबरा, राकेश कोचर, नितीन रुडी आदी वकील सहभागी झाले होते.

टॅग्स :advocateवकिलagitationआंदोलनnagpurनागपूर