दमानियांना लागला दम !

By Admin | Updated: May 17, 2014 02:01 IST2014-05-17T01:05:21+5:302014-05-17T02:01:03+5:30

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील लाटेवर स्वार होऊन नागपूरच्या रिंगणात उतरलेल्या अंजली दमानिया यांचा झाडू पाहिजे तसा चालला नाही. राज्य पातळीवरील नेत्या, बड्या राजकीय नेत्यांवर

Damaniya started! | दमानियांना लागला दम !

दमानियांना लागला दम !

लाखाचा पल्लाही गाठला नाही : चौथ्या क्रमाकांवर समाधान

चंद्रशेखर बोबडे - नागपूर

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील लाटेवर स्वार होऊन नागपूरच्या रिंगणात उतरलेल्या अंजली दमानिया यांचा झाडू पाहिजे तसा चालला नाही. राज्य पातळीवरील नेत्या, बड्या राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेली लढाऊ प्रतिमा, केजरीलांच्या सभेला नागपुरात मिळालेला प्रतिसाद पाहता त्या लाखाचा पल्ला गाठतील, अशी अपेक्षा होती. या अपेक्षाला मात्र, त्यांनी घेतलेल्या कमी मतांमुळे तडा गेला. दमानिया या स्वत:चे डेपॉझिटही वाचविण्यातही अपयशी ठरल्या.

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षावर आरोप आणि केजरीवाल यांचा करिश्मा या दोनच मुद्यांचा आधार घेऊन रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी प्रतिकूल परिस्थितीत पहिल्याच निवडणुकीत घेतलेली ६९0८९ मते राजकीय निरीक्षकांची लक्ष वेधणारी ठरली आहे. इतर अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत रामटेकमध्ये ‘आप’चे प्रताप गोस्वामी यांनीही बरी मते घेतली. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो व त्याला छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मजबूत मोर्चेबांधणी केली होती. या दोन सर्वच बाबींने मजबूत असणार्‍या पक्षांच्या लढतीत आम आदमी पार्टीने उडी घेतली तेंव्हा या पक्षाचा विशेष परिणाम निवडणुकीत दिसून येणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. विशिष्ट लोकांपर्यंंतच र्मयादित असलेला पक्ष, मोजकेच कार्यकर्ते आणि जातीय समीकरणे याचा विचार केला तर आम आदमी पार्टीला अनेक र्मयादा होत्या. विशेष म्हणजे या पक्षाच्या उमेदवार बाहेरच्या होत्या पक्षाला संघटनात्मक पाठबळही नव्हते. केवळ केजरीवाल यांचा करिश्मा आणि भ्रष्टाचाराला विरोध हाच एकमेव आधार या पक्षाचा होता. पक्षाला नाव ‘आम’ असले तरी तो कधीही ‘आम आदमी’चा वाटत नव्हता. मात्र ‘आप स्टाईल’ प्रचाराने दमानिया यांनी शहर ढवळून काढले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दमानिया यांनी झोपडपट्टी व मुस्लिम वस्त्यांमध्ये मुसंडी मारली होती. पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ‘आप’चे वादळ शमलेले दिसले. त्यामुळे चौरंगी लढतीत दमानिया फक्त ३0 ते ४0 हजार मते घेतील, असे अंदाज बांधले जात होते. पण दमानिया यांना ६९0८१ मते मिळाली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मारलेली मजल ही लक्षवेधी तर आहेच शिवाय ‘आप’च्या कार्यकर्त्यांंचा उत्साहही वाढविणारी आहे.‘आप’ला कमजोर समजणार्‍यांनाही ती एक प्रकारची चपराकच आहे, अशी प्रतिक्रया व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच त्यांना मिळणार्‍या मतांमध्ये सातत्य आढळून आले. पहिल्या फेरीत ५८९0, दुसर्‍या फेरीत ४७५६ मते त्यांनी घेतली. त्यानंतरच्या फेरीत त्यांना पडलेली मते ही तीन ते पाच हजार या दरम्यान होती. शहराच्या प्रत्येक भागात ‘आप’ने त्यांचे अस्तित्व अधोरेखित केल्याचेच यावरून दिसून येते. नागपूरकर जनतेने दिलेला कौल मान्य करीत यापुढेही जनतेच्या कामासाठी सातत्याने झटत राहू, असे आश्‍वासन दमानिया यांनी दिले आहे.

रामटेकच्या रिंगणात उतरलेले प्रताप गोस्वामी यांचा राजकीय पिंड नव्हता. आरटीआय कार्यकर्ते, अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे दमानियांसारखे कुठलेही वलय नव्हते. कार्यकर्त्यांंची फौज नव्हती. तरिही इतर अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत त्यांनी २५ हजार ८९९ मते घेतली.

 

Web Title: Damaniya started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.