शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

नागपूर विभागातील धरणे ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:18 IST

मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये पाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.

ठळक मुद्दे५ धरणे १०० टक्के, ५ धरणे ९० टक्केवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह एकूणच विभागातील पाणीटंचाई दूर झाली आहे. नागपूर विभागातील धरणांमध्येपाणीच पाणी आहे. विभागातील एकूण १८ धरणांपैकी ५ धरणे १०० टक्के तर ५ धरणे ९० टक्केवर भरली आहेत.नागपूर विभागात एकूण मोठी धरणे १८ आहेत. यापैकी गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा, गडचिरोलीतील दिना, आणि वर्धा जिल्ह्यातील धाम व पोथरा ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९६.१६ टक्के, कामठी खैरी ९४.११ टक्के, वडगाव ९१.४४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला ९३.०६ टक्के, कालिसरार ९४.८४ टक्के भरली आहेत. यासोबतच लोअर नांद ८५.५६ टक्के, सिरपूर ८५.२१ टक्के, लोअर वर्धा ८२.६६ टक्के इतकी भरली आहेत. उर्वरित धरणांमध्ये रामटेक २९.२३ टक्के, बोर ५६.८४ टक्के, गोसेखुर्द ५०.८७ टक्के, बावनथडी ३४.७१ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३०.४९ टक्के इतके भरले आहे.पाच वर्षातील सर्वाधिक साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात यंदा धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. विभागातील १८ मोठ्या धरणातील पाणीसाठा क्षमता ३५५२.२६ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेला १३ सप्टेंबर रोजी या धरणांमध्ये एकूण २७५८.२४ दलघमी म्हणजेच ७७.६५ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षातील आजच्याच दिवसातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास तो कितीतरी अधिक अआहे. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ १६४८.०८ दलघमी म्हणजेच ४६.३८ टक्के इतका साठा होता. त्यापूर्वी २०१७ मध्ये ११६५.३५ दलघमी, २०१६ मध्ये २००९.०४ दलघमी, २०१५ मध्ये २३५५.६९ दलघमी आणि २०१४ मध्ये २५४९.१३ दलघमी इतका होता.

टॅग्स :DamधरणWaterपाणी