डीए वाढीला ग्रहण
By Admin | Updated: May 14, 2014 01:28 IST2014-05-14T00:50:31+5:302014-05-14T01:28:37+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. आर्थिक संकटाचे कारण समोर करीत महापालिका प्रशासनाने सध्याच वाढीव डीए लागू केला जाणार नाही,

डीए वाढीला ग्रहण
नागपूर : महापालिकेच्या कर्मचार्यांना महागाई भत्ता (डीए) मिळण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. आर्थिक संकटाचे कारण समोर करीत महापालिका प्रशासनाने सध्याच वाढीव डीए लागू केला जाणार नाही, असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे डीए वाढीच्या संदर्भातील जीआर दोन दिवसांपूर्वीच महापालिकेला प्राप्त झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुक्त श्याम वर्धने यांच्याशी लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे यांनी चर्चा केली. आयुक्तांनी विविध विभागांकडून होत असलेल्या उत्पन्नाचा आढावा घेतला. यानंतर डीएत वाढ करणे शक्य नाही, असा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वीच महापालिका कर्मचार्यांच्या डीएमध्ये १0 टक्के वाढ करण्यात आली होती.
महापालिकेता सुमारे १२ हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. यात चार हजार ऐवजदार आहेत. ऐवजदार वगळता अन्य कर्मचारी व अधिकार्यांना डीए लागू होतो. डीएत वाढ केली तर तिजोरीवर आणखी बोझा वाढतो.
सध्या महापालिकेचे उत्पन्न बघता कर्मचार्यांचे पगार देणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत डीए देणे शक्य दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंंत महापालिकेतील कर्मचार्यांना महिन्याच्या १0 तारखेला पगार मिळायचा. मात्र, सध्या २0 तारखेपर्यंंंत पगार दिला जात आहे. यामुळे कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांना एप्रिल महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही, अशी माहिती आहे.
एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू झाल्यानंर राज्यातील महापालिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अमरावती महापालिकेच्या कर्मचार्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. तेथील कर्मचार्यांनी महापौरांना पत्र लिहून लेखा व वित्त अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे नागपूर महापालिकेत कर्मचार्यांना पगार उशिरा मिळत आहे, मात्र पगार अडलेले नाहीत.
महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे यांनी सांगितले की, सद्यस्थितीत डीएमध्ये वाढ करणे शक्य नाही. मार्चच्या शेवटी वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाली. यासाठी पगाराच्या पॅटर्नमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. २0 तारखेपर्यंंत पगार दिला जात आहे. विभागांकडून पगाराची बिले उशिरा मिळत असल्यामुळे कर्मचार्यांचा पगार वेळेत करण्यात अडचणी जात आहेत, असेही गाडगे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)