शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
3
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
5
Virat Kohli: कोहली बनला लिमिटेड ओव्हर्सचा 'किंग', सचिन तेंडुलकरचा १८,४३६ धावांचा विक्रम मोडला!
6
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
7
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
8
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
9
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
10
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
11
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
12
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
13
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
14
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
15
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
16
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
17
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
18
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
19
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
20
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव

Maharashtra Assembly Election 2019 : ५२ उमेदवारांच्या सोशल मीडियावर ‘सायबर सेल’चा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 20:30 IST

नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबल्क एसएमएस, पोस्टवर बारीक नजर : आतापर्यंत तीन उमेदवारांनीच मागितली परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर नजर ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. तीन उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग करण्यासंदर्भात रीतसर परवानगी मागितली आहे.निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांकडून सभा, रॅली, पत्रकाचा उपयोग करण्यात येतो. मागील काही निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रचारासोबतच विरोधी उमेदवाराच्या दुष्प्रचारासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. अनेकदा भ्रामक आणि खोटी माहितीही याच्या माध्यमातून करण्यात येते आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसोबत उमेदवारांच्या खात्यातूनही हा प्रकार होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून अर्ज भरतानाच उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडियावरील खात्याची माहिती घेण्यात आली आहे. या खात्यावर वॉच ठेवण्यात येतो. याकरिता एक ‘सोशल मीडिया सेल'च तयार करण्यात आला आहे. या सेलमध्ये सायबर विभागातील अधिकाऱ्यांसोबतच सायबर तज्ज्ञाचाही समावेश आहे. या सेलमध्ये २१ कर्मचारी कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा जागांकरता १४६ उमेदवार रिंगणात आहे. यातील ५२ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचारासाठी बल्क एसएमएसचा वापर झाल्याची बाब आढळून आली आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या खात्यावर सायबर सेलची नजर आहे. या उमेदवारांची प्रत्येक पोस्ट तपासून पाहिली जात आहे. यात आचारसंहिता भंग करणारे साहित्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याच प्रमाणे प्रचारासाठी सोशल मीडियाचा करण्यासाठी परवानगी देण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन उमेदवारांनी अर्ज केला आहे.प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. चुकीची, बदनामी करणारा मजकूर असल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकाराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही प्रमाणात बल्क एसएमएसचा वापर झाला असल्याने सायबर सेल अशा उमेवारांवर नजर ठेवून आहे. ५२ उमेदवारांचे खाते सायबर सेलच्या ट्रेकिंगवर आहे.रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Social Mediaसोशल मीडिया