शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूरच्या संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये अस्वच्छतेचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:30 IST

उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देग्राहकांचे आरोग्य धोक्यात : उघड्यावर किचन, ग्लास न धुताच देतात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर अन्न शिजवणे, काळवंडलेल्या टेबल-खुर्च्यावर ग्राहकांना खायला देणे, पिण्याचे रिकामे झालेले ग्लास न धुताच तसेच भरुन पुन्हा पाणी पुरविणे, असा किळसवाणा प्रकार संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये पाहावयास मिळाला. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असून याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.संत्रा मार्केटकडील हॉटेल्समध्ये ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविण्यात येत असल्याची माहिती मिळताच ‘लोकमत’ने या भागातील हॉटेल्सची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव उजेडात आले. संत्रा मार्केटकडील बहुतांश हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होताना दिसला. स्वच्छतेच्या दृष्टीने हॉटेल्समध्ये काहीच खबरदारी घेतल्या जात नसल्याची बाब दृष्टीस पडली.उघड्यावर किचनसंत्रा मार्केटकडील भागात असलेल्या बहुतांंश सर्वच हॉटेल्सचे किचन रस्त्याच्या कडेला आहेत. खाद्यपदार्थ तयार करताना रस्त्यावरील धूळ हवेद्वारे उडून जेवणात मिसळते. उघड्यावरच हॉटेल्समधील स्वयंपाकी मोठमोठ्या पातेल्यात बिर्याणी तयार करताना आढळले. अन्न पदार्थांमध्ये मिसळणाऱ्या धुळीच्या कणांमुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे..स्वयंपाकाची भांडीही घाणेरडीस्वयंपाक केल्यानंतर त्यातील अन्न संपेपर्यंत ते भांडे तसेच ठेवण्यात येते. पुन्हा स्वयंपाक करण्याच्या पूर्वी ते भांडे थातूरमातूर पद्धतीने धुण्यात येते. यामुळे बहुतांश हॉटेल्समधील भांडी घाणेरडी असल्याचे पाहणीत आढळून आले. याच घाणेरड्या भांड्यात अन्न शिजवून ते ग्राहकांना पुरविण्यात येते. स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीच काळजी हॉटेल्समध्ये घेण्यात येत नसल्याची बाब निदर्शनास आली.कोंदट वातावरणात बसण्याची व्यवस्थाअतिशय अरुंद जागेत किचन, खाद्यपदार्थ ठेवण्याची आणि ग्राहकांच्या बैठकीची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. यामुळे कोंदट वातावरणात बसून ग्राहकांना जेवण करावे लागते. दुसरा पर्याय म्हणजे ग्राहकांसाठी रस्त्याच्या कडेला टेबल खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात रस्त्यावरील धूळ सहज टेबलवर उडते. त्यामुळे आत बसल्यास घाणेरडे वातावरण आणि बाहेरही धुळीचे साम्राज्य अशी परिस्थिती पाहावयास मिळाली.ग्लास न धुताच देतात पाणीएका हॉटेलमध्ये काही काळ थांबल्यानंतर एक धक्कादायक प्रकार दिसला. हॉटेलमध्ये पिण्याचे पाणी पुरविणारा कामगार सात-आठ ग्लासचा ट्रे रिकामा झाल्यानंतर ट्रे घेऊनहॉटेलमधील बेसिनजवळ जात होता. तेथे ट्रे मधील ग्लास खाली काढून धुण्याऐवजी पुन्हा त्याच ग्लासमध्ये पाणी भरून हा कर्मचारी ग्राहकांना पाणी देताना दिसला. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची बाब उजेडात आली.काही पैशांसाठी आरोग्याशी तडजोडसंत्रा मार्केटकडील भागात ग्राहकांना कमी पैसे देऊन जेवण किंवा नाश्ता पुरविण्यात येतो. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील असंख्य प्रवासी या हॉटेल्समध्ये धाव घेतात. पैसे कमी लागत असले तरी आरोग्यासाठी या हॉटेल्समधील स्वच्छता धोकादायक आहे, या गंभीर बाबीकडे ग्राहक दुर्लक्ष करतात. यामुळे ग्राहकांना विविध आजार जडण्याची शक्यता निर्माण होते.घरगुती सिलिंडरचा वापररेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागात स्वयंपाकासाठी घरगुती सिलिंडर वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. व्यावसायिक वापरासाठी वेगळ्या सिलिंडरची नोंदणी करावी लागते. परंतु या नियमाकडे दुर्लक्ष करून बहुतांश हॉटेल्सचे संचालक घरगुती सिलिंडरच स्वयंपाकासाठी वापरताना दिसले. या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन नागरिकांना जाणवणारी सिलिंडर टंचाई दूर करण्याची गरज आहे. 

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर