शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पीक विमा योजनेमुळे कंपन्या मालामाल; शेतकरी कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:06 PM

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्दे १० विमा कंपन्यांना दरवर्षी १०,००० कोटी नफा

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.विशेष म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अहवालातच ही बाब स्पष्ट झाली आहे. राष्ट्रीय किसान समन्वय समितीचे संयोजक विवेकानंद माथने यांनी या अहवालातील जी आकडेवारी सादर केली ती धक्कादायक आहे.

आकडेवारी काय सांगते?वर्ष २०१६-१७ मध्ये ५.७५ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढण्यात आला. त्यासाठी विमा कंपन्यांना तब्बल २२,१८० कोटी प्रीमियम व राज्य/ केंद्र शासनाच्या अनुदानापोटी मिळाले. त्यावर्षी पीक विम्याचे एकूण १२,९४८ कोटीचे दावे विमा कंपन्यांनी मंजूर केले. त्यामुळे विमा कंपन्यांना ९,२३२ कोटी लाभ झाला.असाच प्रकार २०१७-१८ या वर्षातही घडण्याची शक्यता आहे. ५.१६ कोटी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढला गेला आहे व त्यासाठी विमा कंपन्यांना २४,७१० कोटी दिले आहेत. यापैकी खरीप २०१७ साठी विमा कंपन्यांनी १८ जूनपर्यंत ८७२४ कोटींचे दावे मंजूर केले आहे. रबी हंगामाचे दावे ६००० कोटी होतील हे मान्य केले तरी यावर्षीही एकूण दावे १४,००० कोटीचे असण्याची व त्याद्वारे विमाकंपन्यांना १०,००० कोटी नफा होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाबतीतही २०१६-१७ मध्ये असाच प्रकार घडला आहे. त्यावर्षी ८२.७३ लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी विमा कंपन्यांना ३,६२२.११ कोटी दिले. विमा कंपन्यांनी २१६२.४७ कोटींचे दावे मंजूर केले व १४६० कोटी नफा कमावला आहे. २०१७-१८ची महाराष्ट्राची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.याबाबतीत राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व नीती आयोग यांची भेट घेऊन ही योजना बंद करून त्याऐवजी सरळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली अशी माहिती माथने यांनी दिली.मजेची बाब म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना २०१६ साली आली आणि दोन वर्षात तिचा फज्जा उडालेला आहे. विशेष म्हणजे पंजाब सरकारने ही योजना लागू केलीच नाही तर बिहार सरकारने ही योजना यावर्षीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षीच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने कृषी योजनांसाठी ४६,७०० कोटी ठेवले आहेत. त्यापैकी १३,००० कोटी या पीक विमा योजनेसाठी आहेत. ही रक्कम अंतत: कुणाला मिळणार आहे हे उघड आहे.योजना काय आहेप्रधानमंत्री फसल बिमा योजनेमध्ये विम्याचे प्रीमियम शेतकऱ्यांच्या पीककर्जातून कापले जाते. याशिवाय या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकारही अनुदान देते. ही सर्व राशी विमा कंपन्यांना मिळते व त्यातून पिकाचे नुकसान झाले तर विमा दाव्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या गोरखधंध्यात विमा कंपन्या दरवर्षी १०,००० कोटीच्या जवळपास नफा कमवत आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती