शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पिकांच्या नुकसानीचा अहवाल अद्याप शासनाकडे गेलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 23:25 IST

Crop damage reports not reached government, nagpur newsपावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले. पंचनामेही झाले. परंतु या पंचनाम्याचा अहवाल अद्याप शासनाकडे पाठविण्यातच आला नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका, दिवाळीपूर्वी कशी मिळणार मदत 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे जाहीर केले. पंचनामेही झाले. परंतु या पंचनाम्याचा अहवाल अद्याप शासनाकडे पाठविण्यातच आला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर व त्यानंतर परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाकडून याला बराच विलंब लागला. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर आवश्यक सूचनाच पाठविण्यात आल्या नाही. त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब झाला. महसूल शाखेकडे माहिती गोळा करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी आहे. परंतु त्यांच्याकडून योग्यरीत्या काम होत नसल्याचे सांगण्यात आले. विभागातील कर्मचारी महत्त्वाचे काम सोडून इतर कामात व्यस्त असतात. त्याचा परिणाम या कामावर होत असल्याचे सांगण्यात येते. कसेबसे पंचनामे पार पडले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यापूर्वी सर्वच नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पाठवायचा होता. तशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आल्या. परंतु अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या आदेशाला कानाडोळा करण्यात आला. यामुळे नुकसानीचा अहवाल वेळेत शासनाकडे सादर झाला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानासाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अहवालास उशीर झाल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDiwaliदिवाळी