शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:56 IST

जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ५२ टक्के पेरण्या आटोपल्या : सरासरीच्या २४ टक्के पाऊस कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात कापूस प्रथम व सोयाबीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत झालेल्या पेरणीतील सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे कापसाने व्यापले आहे. तर पावसामुळे अद्यापही भात पिकाच्या रोवणीला सुरुवात झाली नाही. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५ लाख ७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यातील ४ लाख ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. कापसाचे एकूण नियोजित क्षेत्र हे २ लाख २५ हजार हेक्टर आहे. सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भात पिकाचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते. परंतु, हवामान खात्याचा हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन यंदाही उशिराच झाले. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा आणि पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्या अनुषंगे ४८ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत. भात पिकासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने भाताच्या पेरण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे.जुलै महिना पावसाचा असतो. परंतु, अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून विदर्भात तुलनेने फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे. तरीसुद्धा आजवर म्हणजेच ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २९६.४ मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ११ जुलैपर्यंत केवळ २२५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्याने कमी आहे.आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ५२.१७ टक्के म्हणजेच २ लाख ५० हजार ०२० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कापसाची १ लाख ६४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ४८ हजार ८२७ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तुरीची ३३ हजार २३७ हेक्टरवर तर ज्वारीची १३०६.६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत धानाने एकूण २५२४.६३ हेक्टर तर डाळींनी ३३ हजार ७४४ हेक्टर इतके क्षेत्र व्यापले आहे.अद्यापतरी संकट नाहीजून महिन्याच्या शेवटीशेवटी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. पण आणखी १० दिवस पावसाला उशीर झाल्यास नक्कीच फटका बसू शकतो. मुळात मान्सूनला उशीर झाल्याने यावर्षी पेरण्या उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे टक्केवारी कमी आहे. त्यात भात पिकांसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधिकारीदुबार पेरणीचे संकट आहेचहवामान खात्याचे अंदाज यावर्षी चुकीचे ठरत आहेत. जो काही पाऊस झाला आणि त्यात ज्या पेरण्या झाल्या त्या पिकांना पाऊस थांबल्यामुळे फटका बसणारच आहे. पण ज्यांनी अजूनही पेरण्या केल्या नाहीत, त्यांनी १५ जुलैनंतर पेरण्या केल्यास २५ टक्के उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. कारण पेरणीचा एक विशिष्ट हंगाम असतो आणि त्या हंगामात पेरणी होऊ शकली नाही.श्रीधर ठाकरे, कृषीतज्ज्ञ

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती