शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:56 IST

जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ५२ टक्के पेरण्या आटोपल्या : सरासरीच्या २४ टक्के पाऊस कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याच्या शेवटीशेवटी पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात गेली. गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्यात ५२.१७ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे घोंगावत आहे. विशेष म्हणजे अजूनही ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या नाहीत.गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील सुमारे ५२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात कापूस प्रथम व सोयाबीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत झालेल्या पेरणीतील सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे कापसाने व्यापले आहे. तर पावसामुळे अद्यापही भात पिकाच्या रोवणीला सुरुवात झाली नाही. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ५ लाख ७ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. त्यातील ४ लाख ७९ हजार २१० हेक्टर क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे आहे. कापसाचे एकूण नियोजित क्षेत्र हे २ लाख २५ हजार हेक्टर आहे. सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भात पिकाचे ९४ हजार २०० हेक्टर इतके असे क्षेत्र आहे. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असे भाकित वर्तविले होते. परंतु, हवामान खात्याचा हा अंदाज चुकला. पावसाचे आगमन यंदाही उशिराच झाले. गेल्यावर्षी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी यंदा सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा आणि पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्या अनुषंगे ४८ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या झालेल्या नाहीत. भात पिकासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने भाताच्या पेरण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहे.जुलै महिना पावसाचा असतो. परंतु, अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून विदर्भात तुलनेने फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता लागली आहे. तरीसुद्धा आजवर म्हणजेच ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी साधारणत: २९६.४ मिलिमीटर इतका पाऊस पडत असतो. मात्र, यंदा १ जून ते ११ जुलैपर्यंत केवळ २२५ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या तुलनेत सुमारे २४ टक्क्याने कमी आहे.आजवर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ५२.१७ टक्के म्हणजेच २ लाख ५० हजार ०२० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात कापसाची १ लाख ६४ हजार १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ४८ हजार ८२७ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तुरीची ३३ हजार २३७ हेक्टरवर तर ज्वारीची १३०६.६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत धानाने एकूण २५२४.६३ हेक्टर तर डाळींनी ३३ हजार ७४४ हेक्टर इतके क्षेत्र व्यापले आहे.अद्यापतरी संकट नाहीजून महिन्याच्या शेवटीशेवटी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. पण आणखी १० दिवस पावसाला उशीर झाल्यास नक्कीच फटका बसू शकतो. मुळात मान्सूनला उशीर झाल्याने यावर्षी पेरण्या उशिरा सुरू झाल्या. त्यामुळे टक्केवारी कमी आहे. त्यात भात पिकांसाठी अपेक्षित पाऊस न झाल्याने भाताच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधिकारीदुबार पेरणीचे संकट आहेचहवामान खात्याचे अंदाज यावर्षी चुकीचे ठरत आहेत. जो काही पाऊस झाला आणि त्यात ज्या पेरण्या झाल्या त्या पिकांना पाऊस थांबल्यामुळे फटका बसणारच आहे. पण ज्यांनी अजूनही पेरण्या केल्या नाहीत, त्यांनी १५ जुलैनंतर पेरण्या केल्यास २५ टक्के उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार आहे. कारण पेरणीचा एक विशिष्ट हंगाम असतो आणि त्या हंगामात पेरणी होऊ शकली नाही.श्रीधर ठाकरे, कृषीतज्ज्ञ

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती