शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणानेच गुणवत्ता निर्माण केली

By admin | Updated: February 25, 2016 03:07 IST

जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे.

अशोक गोडघाटे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ विषयावर व्याख्याननागपूर : जगाच्या पाठीवर अनेक क्रांती झाल्यात परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली क्रांती ही अभूतपूर्व आहे. त्यांच्यामुळे शोषित- वंचितांना मिळालेल्या आरक्षणानेच देशात गुणवत्ता निर्माण होऊ शकली, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ या विषयावरील व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प बुधवारी गुंफण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, व्ही.टी. चिकाटे, एन.आर. सुटे, विलास गजघाटे, प्राचार्य डॉ. पी. सी. पवार, डॉ. मालती रेड्डी, डॉ. प्रकाश खरात प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. गोडघाटे म्हणाले, हयात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा हयात नसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिक बलशाली आहेत. ते म्हणत भारतात अन्याय अत्याचाराचे मूळ धर्मग्रंथांत आहे. धर्मग्रंथांना प्रमाण मानत येथील धर्मग्रंथांच्या आधारावर येथील मानवाला पशुतुल्य वागणूक दिली. या गुलामीला स्वत: गुलामांनी मान्यता दिली होती, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. उकिरड्यावर फेकलेल्या पत्रावळीसाठी भांडणारा समाज आज एअर कंडिशन गाड्यात फिरतो आहे ही बाबासाहेबांच्या क्रांतीची झलक आहे. हे एक मोठे परिवर्तन घडून आले आहे. दलित, आंबेडकरवादी साहित्य प्रवाहाला जन्म दिला. ज्या धर्मांनी त्यांना लाथाडले होते, आज त्याच धर्माची चिकित्सा करण्याचे बळ आंबेडकरी विचाराने प्रदान केले आहे. १९२९ ला बाबासाहेबांनी सायमन कमिशनला दिलेल्या निवेदनात त्यांनी अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याची मागणी केली. जगाच्या पाठीवरती एवढे परिवर्तन एका माणसाने घडवून आणलेले कुठेही दिसत नाही,असेही प्रा. गोडघाटे यांनी सांगितले. डॉ. मालती इंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेश त्रिपाठी यांनी संचालन केले. डॉ. गौतम कांबळे व डॉ. अविनाश फुलझेले यांनी परिचय करून दिला. प्रा. तेलकापल्लीवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डॉ. आंबेडकर नव संस्कृतीचे निर्माणकर्ते -खांडेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका नव संस्कृतीचे निर्माणकर्ते आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. बाबासाहेबांनी आपल्याला मानवी विकासाची संस्कृती दिली आहे. त्यामुळे शब्दरूपात न अडकता विकलांग-दिव्यांग, समता- समरसता याचा अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.