शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात वाहन पार्किंगच्या वादात दाम्पत्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:55 IST

घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे.

ठळक मुद्देजरीपटका म्हाडा कॉलनीतील घटना : आरोपींच्या जामीनामुळे पीडित संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरासमोर वाहन पार्क करण्यावरून जरीपटका येथील म्हाडा कॉलनीत झालेल्या वादात एक दाम्पत्य आणि त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात आरोपींना पोलिसांनी जामीन दिल्यामुळे पीडित कुटुंबीय संतप्त आहे.रुबीना तबस्सूम कुरैशी, तिचे पती माजिद कुरेशी आणि नातेवाईक (रुबीनाचे वडील) नसीम शेख अशी जखमीची नावे आहे. कुरैशी परिवार म्हाडा कॉलनीत राहतो. आरोपी अरमान अंसारी आणि शकीला अंसारी हेसुद्धा त्याच वस्तीत राहतात. गेल्या २२ जुलै रोजी दुपारी रुबीनाचे वडील वाहनातून सामान उतरवित होते. त्याचवेळी अरमान तिथे आला. तो रुबीनाच्या वडिलांशी वाद घालू लागला. रुबीना व तिचे कुटुंबीय मध्यस्ती करू लागले. त्यामुळे अरमान आणि त्याची आई शकिला यांनी त्यांच्यावर हल्ला केला. रुबीना, तिचे पती आणि नसीम शेख यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे वस्तीत तणाव निर्माण झाला. तिघांनाही जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुबीनाचा उपचार सुरू असून दोघांना सुटी देण्यात आली. जरीपटका पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ३२४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपींची जामीनावर सुटका केली. गुरुवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले. पोलिसांनी आरोपींना जामीनावर सोडल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले.माजिद कुरेशी यांनी आरोपीच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर जरीपटका पोलिसांचे म्हणणे आहे की, मेडिकल रिपोर्टच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येईल. शेजाऱ्यांमधील भांडण असल्याने आणि योग्य जामीनदार सादर केल्याने आरोपींना जामीन देण्यात आला.पूर्वीपासूनच सुरू होता वादवाहन पार्किंगवरून दाम्पत्य व आरोपींमध्ये पूर्वीपासूनच वाद सुरू होता. आरोपी त्यांना घरासमोर वाहन उभे केल्यास शिवीगाळ करीत होते. शेजारी असल्याने दम्पत्यांनी वाद वाढवणे योग्य समजले नाही. ताजा घटनेने प्रकरण चर्चेला आले. रुबीनाची प्रकृती गंभीर असल्याने तिचे कुटुंबीय आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर