मतमोजणीचे वेळापत्रक कोलमडले
By Admin | Updated: May 17, 2014 01:03 IST2014-05-17T01:03:50+5:302014-05-17T01:03:50+5:30
लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला.

मतमोजणीचे वेळापत्रक कोलमडले
१२ तास चालली प्रक्रिया : टपाल मतांसाठीही विलंब नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री ७.३0 पर्यंंत चालली. १२ तासापेक्षा जास्त वेळ यासाठी लागला. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी चार तासात मतमोजणीची प्रक्रिया संपेल, असे नियोजन केले जाईल, असे पत्रकारांना सांगितले. होते. मतमोजणीच्या एक दिवस आधी त्यांनी मतमोजणी ४ वाजता संपेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात नागपूरचा निकाल जाहीर करण्यास सायंकाळ व रामटेकचा निकाल जाहीर होण्यास रात्रीचे ७.३0 वाजले. टपाल मतमोजणीची प्रक्रिया चार तासात पूर्ण केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्यालाही विलंब झाला. रामटेकच्या टपाल मतांची मोजणी दुपारी ३ वाजता तर नागपूरच्या टपाल मतांची मोजणी ५ वाजता पूर्ण झाली. मतमोजणीस्थळी प्रथमच वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. एका विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रतिनिधींना दुसर्या मतदारसंघात प्रवेश करता येत नव्हता. दोन रांगेत प्रत्येकी दहा असे एकूण वीस टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीलाही नियोजित वेळेपेक्षा अध्र्या तासाने म्हणजे ८.३0 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा कल बरोबर १0 वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरच्या फेर्यांचा कल जाहीर करण्यास विलंब होत गेला. फेरीनिहाय निकाल जाहीर करताना अनेक वेळा खुद्द जिल्हाधिकार्यांना अडथळे आले. रामटेकच्याबाबतीत असा प्रकार घडला नाही. रामटेकच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया संथ होती. मात्र फेर्या कमी असल्याने नागपूरचा निकाल आधी जाहीर करण्यात आला. मतदानस्थळी पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. प्रत्येकाला सुरक्षेच्या तीन टप्प्यातून जावे लागत होते. त्याचा फटका अनेकांना बसला. मतमोजणीच्या कामात असलेल्या कर्मचार्यांच्या भोजनाकडे प्रशासनाने यंदा काळजीपूर्वक लक्ष दिले असले तरी पत्रकारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पत्रकारांसाठी तयार करण्यात आलेल्या मीडिया कक्षातही इतर कर्मचार्यांनीच ठाण मांडले. त्यामुळे बसावे कुठे, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना पडला. कक्षातील टीव्ही पाहण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचाही फटका माध्यमांच्या प्रतिनिधींना बसला. कक्षात पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. केवळ औपचारिकता म्हणून हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. (प्रतिनिधी)