शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

समुपदेशन व संगीतातून उलगडले विवाह अनुबंधाचे मर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:18 IST

तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना परस्परांशी जोडणारा रेशीमबंध असतो. मात्र हे रेशीमबंध चिरकाल टिकून राहण्यासाठी विश्वास, त्याग, समंजसपणा आवश्यक असतो. बऱ्याच सिनेगीतांमधून हा अनुबंध मांडला गेला आहे. विवाहाच्या रेशीमगाठीचे मर्म तज्ज्ञांचे समुपदेशन आणि सोबत चालणाऱ्या संगीतातून उलगडत गेले.

ठळक मुद्देअशा ‘जुळून येती रेशीमगाठी’ : रिद्धी-सिद्धी व ऋतुराजचे अनोखे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो दोन जीवांसोबत दोन कुटुंबांना परस्परांशी जोडणारा रेशीमबंध असतो. मात्र हे रेशीमबंध चिरकाल टिकून राहण्यासाठी विश्वास, त्याग, समंजसपणा आवश्यक असतो. बऱ्याच सिनेगीतांमधून हा अनुबंध मांडला गेला आहे. विवाहाच्या रेशीमगाठीचे मर्म तज्ज्ञांचे समुपदेशन आणि सोबत चालणाऱ्या संगीतातून उलगडत गेले.रिद्धी-सिद्धी या सामाजिक संस्थेच्यावतीने वैवाहिक जीवनाचे गुपित उलगडणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या अनोख्या मार्गदर्शक कार्यक्रमाचे गुरुवारी सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना ऋतुराज संस्थेच्या संचालिका मुग्धा तापस यांची होती. दाम्पत्य जीवन सुखकर ठेवण्यासाठी प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश पानगावकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन व त्याला सांगितीक फोडणी हे या कार्यक्रमाचे विशेषत्व ठरले. जीवनात जन्मत:च मिळालेली नाती आपण सहज स्वीकारतो. विवाहानंतर जुळलेले नातेसंबंध स्वीकारताना व ते निभावताना साहचर्य व सामंजस्य आवश्यक असते. विवाहाच्या संदर्भात आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे आली. पूर्वी समाजात बालविवाह प्रचलित होते. पुढे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांद्वारे वधू-वर ठरविण्याची परंपरा चालली. त्यानंतर प्रेमविवाहाचा आणि आतातर लग्नाशिवाय एकमेकांसोबत राहण्याचे ‘लिव्ह इन रिलेशन’ पर्यंतचे परिवर्तन समाजाने अनुभवले आहे. डॉ. पानगावकर व डॉ. धर्माधिकारी यांनी याबाबत सुरुवातीला मांडणी केली. लग्नासाठी तरुण-तरुणींची मानसिक तयारी, विवाहानंतर जबाबदाऱ्यांची जाणीव, परस्परांच्या अपेक्षापूर्तींसाठी स्वभावात, जीवनशैलीत करावा लागणारा बदल, आर्थिक गरजा व सवयीबद्दल संपूर्ण जाणीव अशा यशस्वी वैवाहिक जीवनाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. मनात जुळणाऱ्या रेशीमगाठींसह उमलणारे प्रेम, लैंगिक संबंधाचे ज्ञान तसेच शारीरिक व मानसिक सुखापर्यंतचे मार्गदर्शन दोन्ही तज्ज्ञांनी केले.या मार्गदर्शनासह संगीताची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली. गायक गुणवंत घटवई, मुकुल पांडे, मंजिरी वैद्य-अय्यर, श्रुती चौधरी या गायकांनी विवाह अनुबंधातील मनाशी संबंधित अनेक श्रवणीय गाणी सादर केली. ‘खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली..., म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान..., नवरवर कृष्णासमान..., प्रथम तुझ पाहता...’ अशा मराठी गीतांसह ‘घडी घडी मेरा दिल धडके..., ऐ मेरी जोहराजबी..., तेरे बिना जिंदगीसे..., जिंदगी प्यार का गीत है...’ अशी अर्थभावपूर्ण गाणी कलावंतांनी सादर केली.गोविंद गडीकर, परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, मुग्धा तापस या वाद्यवृंदांची साथसंगत कार्यक्रमात होती. निवेदन किशोर गलांडे यांनी केले. मार्गदर्शन आणि संगीत असा मेळ असलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन सिद्धी-सिद्धी संस्थेचे डॉ. संजय धोटे यांनी केले. यावेळी महापौर नंदा जिचकार, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, प्रा. राजीव हडप, भय्याजी रोकडे, शरयू तायवाडे, डॉ. विजय धोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :FamilyपरिवारCourtन्यायालय