शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापूस बियाण्यांच्या खर्चाने शेतकऱ्यांची कंबर मोडणार; बीजी-२ बियाणे दरात ४३ रुपयांची वाढ

By सुनील चरपे | Updated: March 25, 2023 17:21 IST

Nagpur News सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादकांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

सुनील चरपे 

नागपूर : केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग तिसऱ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाणे दरांत वाढ केली आहे. यावर्षी प्रतिपाकीट (४५० ग्राम) ४३ रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी ८६ रुपये, तर अतिघन लागवडीसाठी २५६ रुपये अतिरिक्त माेजावे लागणार आहेत. सध्या देशात उपलब्ध असलेले बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक राहिले नसल्याने ते कालबाह्य झाल्याची माहिती कापूस उत्पादकांनी दिली असून, या बियाण्यांचे दर कमी असायला हवेत, असे अभ्यासकांनी सांगितले.

देशात सन २००३ पासून कपाशीच्या बीजी-२ बियाण्यांचा वापर केला जात असून, एचटीबीटी वाणाच्या चाचण्या आणि वापरावर बंदी घातली आहे. बीजी-२ बियाणे कालबाह्य झाल्याने या बियाण्यांच्या उत्पादनाला राॅयल्टी द्यावी लागत नाही. एकदा तयार झालेले बियाणे ३ ते ४ वर्षे चालते. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपनीला केवळ साठवणूक व वाहतुकीचा खर्च करावा लागताे.

अलीकडे कापसाचे उत्पादन सातत्याने घटत असल्याने केंद्र सरकारने काही अटींवर एचटीबीटी वाणाच्या चाचण्यांना परवानगी दिल्याने २ ते ३ वर्षांत नवीन बियाणे बाजारात येईल. बीजी-२ बियाणे कमी दरात विकून त्याचा साठा कमी करणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. आधी कंपन्यांनी राॅयल्टीच्या नावावर शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतले; तर आता केंद्र सरकार पैसे वसूल करीत आहे, असा आराेप शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला.

शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड

देशात दरवर्षी सरासरी ११० लाख हेक्टरवर कपाशीची पेरणी केली जाते. यासाठी ६० ते ६५ टक्के बीजी-२ आणि ३५ ते ४० टक्के बियाणे प्रतिबंधित एचटीबीटी बियाणे वापरले जाते. कपाशीच्या साध्या लागवडीसाठी एकरी दाेन (९०० ग्राम), तर अतिघन लागवडीसाठी सहा पाकिटे (२ किलाे ७०० ग्राम) बियाण्यांची आवश्यकता असते. केंद्र सरकार कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी अतिघन लागवड कपाशीला प्राधान्य देत असून, दुसरीकडे बियाण्यांचे दर वाढवून शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड लादला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाचे दर कमी झाले आहेत. बियाण्यांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. त्यामुळे देशातील कापसाचा पेरा कमी हाेण्याची शक्यता बळावली आहे.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक

कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र

 

गुलाबी बाेंडअळीची बीजी-२ बियाण्यांतील जनुके प्रतिकारशक्ती वाढल्याने सध्याचे बीजी-२ बियाणे गुलाबी बाेंडअळीला प्रतिबंधक राहिले नाही. केंद्र सरकारने ‘अपग्रेडेट’ बियाणे उपलब्ध करून दिल्यास ते शेतकरी अधिक दर देऊन खरेदी करतील.

- दिलीप ठाकरे, सदस्य,

पीएसी (सेबी) तथा ॲग्राेस्टार हातरून

...

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस