शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कालवा दुरुस्ती कामात भ्रष्टाचार?

By admin | Updated: December 2, 2014 00:33 IST

सावनेर तालुक्यातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामाचे कंत्राट देण्यात आले. सदर कंत्राटदार निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून दुरुस्तीचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक

खेकरानाला प्रकल्प : कंत्राटदाराची सिंचन विभागाकडे तक्रारसंजय पोफळी - खापासावनेर तालुक्यातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती कामाचे कंत्राट देण्यात आले. सदर कंत्राटदार निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून दुरुस्तीचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला. या संदर्भात शेतकऱ्यांनी सिंचन विभागातील अभियंत्याकडे तक्रार केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.खेकरानाला हा मध्यम प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या २६ कि.मी. लांबीच्या मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कालव्याचे शेवटचे टोकावर नाला असल्याने नाला ओलांडून पाणी पलीकडे नेण्यासाठी नाल्याच्या दोन्ही बाजूंना भिंती बांधण्यात आल्या व मोठ्या पाईपद्वारे कालव्यातील पाणी पलिकडे नेण्यात आले. सध्या या भिंत व पाईपच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कालव्याच्या या शेवटच्या टोकावर पूर्वी बांधण्यात आलेल्या भिंतीला पाण्याच्या दाबामुळे भगदाड पडले आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात वाहून जाऊ लागले. त्यामुळे कालव्याचे पाणी परिसरातील व नाल्याच्या काठी असलेल्या सावली येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. हा प्रकार अडीच वर्षांपूर्वी घडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी अनेकदा केली. मात्र, सिंचन विभागाने या मागणीकडे लक्ष दिले नाही.वास्तवात या कालव्यातील पाण्यामुळे या परिसरातील २५० एकर शेतीचे सिंचन केले जाते. शेतकऱ्यांचा रेटा वाढल्याने सिंचन विभागाने दीड वर्षांपूर्वी सदर भिंतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्याहीवेळी निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने कालव्यातील पाणी नाल्यात वाहून जाऊ लागले. दुसरीकडे, प्रकल्पात व कालव्यात पाणी असूनही ते सिंचनासाठी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. सध्या याच भिंतीच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराकरवी सुरू आहे. सदर कंत्राटदार निकृष्ट कामे करीत असल्याचा आरोप जाणकारांनी केला. त्यामुळे सावली शिवारातील पिकांना भविष्यात ओलितासाठी कालव्याचे पाणी मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या करण्यात येत असलेले दुरुस्तीचे काम सिंचन विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. या कामात कंत्राटदार हयगय करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, हा प्रकार सिंचन विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यासंदर्भात सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. एन. खापेकर यांनी सांगितले की, या संदर्भात आपल्याकडे कुणाची कसलीही तक्रार आली नाही. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांकडून या संदर्भात माहिती मागवून योग्य कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.