शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा! पक्षफोडीवर संघ, भाजपातील निष्ठावान नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 21:10 IST

Nagpur News ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ असे भाजपचे काम सुरू आहे. आता या पक्षाचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असे करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

नागपूर : विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलिन करायची. नंतर त्यांना ईडी, सीबीआयचा वापर करून गुन्हे दाखल करायचे. नंतर तेच सोबत आले की मंत्री करायचे. ‘भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा’ असे भाजपचे काम सुरू आहे. आता या पक्षाचे नाव भ्रष्ट जनता पार्टी असे करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या पक्षफोडीवर संघ व भाजपातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज असून डोक्यावर उपऱ्यांचे डोंगर चढविण्यासाठी ते झटले का, असा सवालही त्यांनी केला.

वसंतराव देशपांडे सभागृहात सोमवारी आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. विनायकराव राऊत, खा. अरविंद सावंत, मिलिंद नारवेकर, आ. नितीन देशमुख, माजी खा. प्रकाश जाधव, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, जिल्हाप्रमुख राजू हरणे, देवेंद्र गोडबोले, शहरप्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, सतीश हरडे आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, कालपर्यंत पंतप्रधान मोदींवर टीका करणारे आता त्यांना विकास पुरुष म्हणत आहेत. त्यांना सत्तेतून स्वत:चा विकास करायचा आहे, अशी टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या घरी धाडी टाकून धमकावले जात आहे. तुरुंगात टाकले जात आहे. हे आता चालणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तुम्ही मनमानी कराल तर छत्रपतींच्या संस्काराची तलवार तुमच्यावर चालवावी लागेल, असा इशारा देत मर्दाची औलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा व मैदानात या, असे आव्हान त्यांनी भाजप नेत्यांना दिले. पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी जातात. मग, मणिपूरला का जात नाहीत. तेथे डबल इंजिन सरकार असून मणिपूर का धुमसत आहे, असा सवालही त्यांनी केला.

आता ‘होऊन जाऊ द्या चर्चा’

- कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या नावावर पैसा गोळा करण्यात आला. हा जनतेचा पैसा होता. त्याचे काय झाले, त्याचा मालक कोण, हा पैसा कुठे व कसा वापरला याचा जनतेला हिशेब द्या. चीन, रशिया, दक्षिण कोरियाप्रमाणे आपला देश अध्यक्षीय हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे या विरोधात आता उघडपणे बोला. २०१४ मध्ये ‘चाय पे चर्चा’ झाली होती. आता ‘होऊन जाऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवा व गेल्या १० वर्षांत कुणाला काय मिळाले यावर उघड चर्चा घडवून आणा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

फडणवीसांची क्लिप वाजवली, ‘कलंक’ असल्याची टीका

- एकवेळ सत्तेशिवाय राहू पण राष्ट्रवादीसोबत बसणार नाही..नाही..नाही...असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य असलेली क्लिप उद्धव ठाकरे यांनी मोबाइलमधून ऐकवली. यांचे नाही म्हणजे हो समजायचे. सहन होत नाही व सांगताही येत नाही, अशी फडणवीस यांची स्थिती झाली आहे, असे काय हे नागपूरवर कलंक आहे, अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली.

बावनकुळे, तुमचे तिकीट का कापले?

बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं होतं? तुमची पुरती अब्रू जातेय आणि तुम्ही लुडबूड करत आहात. खिळा लागला तरी चालेल पण खुर्ची आहे ना, असेच तुमचे सुरू आहे, असे चिमटे ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना काढले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे