शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 19:50 IST

राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.

ठळक मुद्देमार्चमध्ये २२२ : एप्रिलमध्ये आढळले २००५ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. ३१ मार्चपर्यंत बाधितांची संख्या दर दिवसाला १ ते २७ च्या दरम्यान होती. मात्र एप्रिल महिन्याच्या १ ते २ तारखेच्या दरम्यान रोजच्या रुग्णांत वाढ होऊन ती १०० वर गेली. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.आरोग्य विभागाने दर दिवसाला नोंद होणाऱ्या ‘कोविड-१९’ रुग्णांची आकडेवारी उपलब्ध करून दिली असता, वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ९ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान नोंद झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले. यात रोजच्या रुग्णात होत असलेल्या धक्कादायक वाढीचे वास्तव समोर आले आहे. राज्यात पहिल्या तीन कोरोनाबाधितांची नोंद ९ मार्च रोजी झाली. त्यानंतर ११ मार्च रोजी ११ रुग्ण आढळून आले. १३ मार्च रोजीही एवढ्याच रुग्णांची नोंद होती. १५ मार्च रोजी रुग्णसंख्या कमी होऊन ती पाचवर आली. १७ मार्च रोजी आणखी रुग्णसंख्या घसरून दोनवर आली. १९ मार्चपर्यंत रोज दोन ते तीन रुग्ण आढळून येत होते. २१ मार्च रोजी यात वाढ झाली. त्या दिवशी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २३ मार्च रोजी रुग्णसंख्या दुपटीने वाढत २३ वर पोहचली. २५ मार्च रोजी रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी होऊन दोनवर आली. २७ मार्च रोजी रुग्णात पुन्हा वाढ झाली. २९ मार्च रोजी २२ रुग्ण तर मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी १७ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा प्रभाव एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिसून येऊ लागला. महिन्याच्या पहिल्याच दिवशी १०० रुग्ण पॉझिटिव्ह आले. ४ एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची रोजची संख्या शंभराच्या आत होती. ५ एप्रिल रोजी रुग्णाची संख्या वाढून ती १४८ वर पोहचली. ९ एप्रिलपर्यंत रोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या १५० होती. ११ एप्रिल रोजी मात्र यात वाढ झाली. या दिवशी २२९ रुग्ण आढळून आले.१२ एप्रिल रोजी रोजच्या रुग्णात किंचित घट होऊन ही संख्या १८७ वर पोहचली. परंतु १३ एप्रिल रोजी रोजच्या संख्येत दुपटीने वाढ होऊन एकाच दिवशी ३४४ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात रुग्णाची संख्या २२० होती, तर एप्रिल महिन्यात १३ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या २,१०५ झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा आहे. यावर प्रतिबंध घालायचा असेल तर शासनाच्या सूचनांचे पालन करणे हा एकच उपाय आहे. विशेष म्हणजे, घरीच थांबणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास स्वत:हून रुग्णालयात जाणे, आजार न लपविणे, हे महत्त्वाचे ठरेल.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस