शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
2
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
3
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
4
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
5
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
6
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
7
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
8
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
9
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
10
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
11
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
12
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
13
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
14
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
15
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
16
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
17
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
18
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
19
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
20
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: सावधान! कोरोनानंतर रक्त गाेठणे हे तरुणांतील हृदयघाताचे माेठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 04:59 IST

Post corona side effects: डाॅ. जसपाल अर्नेजा : काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृदयघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिनाभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांतही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना आणि त्यातून बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टीव्हायरल औषध आहे, जे गृहविलगीकरणातील रुग्णांना दिले जाते. हा प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषध देण्याची गरज नाही. एम्सने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. ही चमत्कार घडविणारी किंवा सिद्धता असलेली औषधी नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. दुसरे औषध म्हणजे स्टेराॅईड. पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराॅईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२ च्या खाली घसरला आहे. या औषधामुळे रुग्ण बचावाचा दर वाढला आहे. स्टेराॅईडमुळे साईड इफेक्ट हाेतात, पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराॅईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचेही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळविणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचे ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. ते वाढले असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळविणारी ही औषधी दिली जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?साेशल मीडिया व वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?दुसरी लाटेच्या प्रभावाचे आकलन करण्यात कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढी वाढेल, याची अपेक्षा नव्हती. ऑक्सिजनपुरवठा वाढवण्यास स्थानिक प्रशासन चांगले काम करीत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागविली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?सध्या देशात साडे तीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मे च्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाख जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे का?पुढल्या वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे माेहीम राबवावी लागेल.

चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढविण्याचे प्रकार का वाढले?अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट अटॅक येण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस