शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus: सावधान! कोरोनानंतर रक्त गाेठणे हे तरुणांतील हृदयघाताचे माेठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 04:59 IST

Post corona side effects: डाॅ. जसपाल अर्नेजा : काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृदयघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिनाभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांतही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना आणि त्यातून बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टीव्हायरल औषध आहे, जे गृहविलगीकरणातील रुग्णांना दिले जाते. हा प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषध देण्याची गरज नाही. एम्सने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. ही चमत्कार घडविणारी किंवा सिद्धता असलेली औषधी नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. दुसरे औषध म्हणजे स्टेराॅईड. पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराॅईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२ च्या खाली घसरला आहे. या औषधामुळे रुग्ण बचावाचा दर वाढला आहे. स्टेराॅईडमुळे साईड इफेक्ट हाेतात, पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराॅईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचेही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळविणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचे ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. ते वाढले असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळविणारी ही औषधी दिली जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?साेशल मीडिया व वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?दुसरी लाटेच्या प्रभावाचे आकलन करण्यात कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढी वाढेल, याची अपेक्षा नव्हती. ऑक्सिजनपुरवठा वाढवण्यास स्थानिक प्रशासन चांगले काम करीत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागविली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?सध्या देशात साडे तीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मे च्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाख जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे का?पुढल्या वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे माेहीम राबवावी लागेल.

चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढविण्याचे प्रकार का वाढले?अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट अटॅक येण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस