शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

CoronaVirus: सावधान! कोरोनानंतर रक्त गाेठणे हे तरुणांतील हृदयघाताचे माेठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 04:59 IST

Post corona side effects: डाॅ. जसपाल अर्नेजा : काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज

मेहा शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरीरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृदयघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिनाभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांतही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना आणि त्यातून बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे हृदयावर परिणाम होण्याची शक्यता आहे का? डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टीव्हायरल औषध आहे, जे गृहविलगीकरणातील रुग्णांना दिले जाते. हा प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषध देण्याची गरज नाही. एम्सने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. ही चमत्कार घडविणारी किंवा सिद्धता असलेली औषधी नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. दुसरे औषध म्हणजे स्टेराॅईड. पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराॅईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२ च्या खाली घसरला आहे. या औषधामुळे रुग्ण बचावाचा दर वाढला आहे. स्टेराॅईडमुळे साईड इफेक्ट हाेतात, पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराॅईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचेही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळविणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचे ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. ते वाढले असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळविणारी ही औषधी दिली जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?साेशल मीडिया व वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?दुसरी लाटेच्या प्रभावाचे आकलन करण्यात कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढी वाढेल, याची अपेक्षा नव्हती. ऑक्सिजनपुरवठा वाढवण्यास स्थानिक प्रशासन चांगले काम करीत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागविली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?सध्या देशात साडे तीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मे च्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाख जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे का?पुढल्या वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे माेहीम राबवावी लागेल.

चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढविण्याचे प्रकार का वाढले?अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट अटॅक येण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस