शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 08:39 IST

Nagpur News अमरावती जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ठळक मुद्देमधल्या काळात कोरोना प्रतिबंधक नियम न पाळल्याने वाढले रुग्णइतक्या कमी दिवसांत तिसरी लाट येणे किंवा लाटेवर लाट येणे शक्य नाही. परंतु या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्ण अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची दुसरी लाट अमरावती येथून सुरू झाल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, याच जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, इतक्या कमी दिवसांत तिसरी लाट येणे किंवा लाटेवर लाट येणे शक्य नाही. परंतु या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण वाढायला लागले. १ फेब्रुवारी रोजी ९२ रुग्णांची नोंद झाली असताना १४ फेब्रुवारी रोजी ३९९ रुग्णांची नोंद झाली. १ ते १४ फेब्रुवारीदरम्यान ३,३१५ रुग्णांची वाढ झाली. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान ४,२३० रुग्णांची भर पडताच जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावले. २२ ते २८ फेब्रुवारीमध्ये ५,५९३ रुग्णांची नोंद झाली. वाढत असलेल्या रुग्णसंख्येला घेऊनच २२ फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लावण्यात आले.

-अंतर्गत कडक निर्बंधामुळे दुसरी लाट ओसरल्याचे चित्र

अमरावती जिल्ह्यात निर्बंधाचा प्रभाव दिसून येण्यास साधारण १५ दिवसांचा कालावधी लागला. त्यामुळे २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ५,५९३ नवे रुग्ण आढळून आले. १ ते ११ मार्च दरम्यान ६,१६६ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. १२ ते २१ मार्चदरम्यान ४,११२, २२ ते ३१ मार्चदरम्यान ३,२४०, १ ते १० एप्रिलदरम्यान ३,२८८ नवे रुग्ण आढळून आले. दुसरी लाट ओसरत असल्याचे मत व्यक्त होऊ लागले.

- यामुळे तिसऱ्या लाटेची शंका वाढली

रुग्णसंख्येत कमालीची घट येताच, कोरोनावर नियंत्रण मिळविणारा अमरावती जिल्हा ‘मॉडेल’ म्हणून नावारुपास आला. परंतु १५ मार्चपासून राज्याचे निर्बंध लागू झाले. जिल्ह्याचे कडक निर्बंध निघाले. शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची अंतर्गत रहदारी वाढली. लग्न सोहळ्यात लोक सहभागी होऊ लागले. परिणामी, पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. ११ ते २० एप्रिलदरम्यान ५,९४२, २१ ते ३० एप्रिलमध्ये ७,८५२ नवे रुग्ण आढळून आले. १० मे रोजी तर रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १,००५ रुग्णांची नोंद झाली. १ ते १० मे यादरम्यान सर्वाधिक १०,७२३ रुग्ण आढळून आले. ११ ते १९ मेदरम्यान ८,८५९ रुग्णांची नोंद झाली. या संख्येला घेऊनच अमरावतीमध्ये तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे; परंतु जिथे ग्रामीण भागात कमी रुग्ण होते तिथे रुग्ण वाढल्याने रुग्णसंख्येत भर पडल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-तिसरी लाट नक्कीच नाही

मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होताना दिसत होती. यादरम्यान कोरोनाचा प्रतिबंधक नियमांची लोकांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. याच काळात लग्न सोहळे, कौटुंबिक कार्यक्रम झाले. त्याचा परिणाम, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दिसायला लागला. अमरावती जिल्ह्यात दुसरी लाट गेलीच नाही तर तिसऱ्या लाटेचा प्रश्न येतोच कुठे? सध्या मागील काही दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा कमी होताना दिसून येत आहे.

-डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती जिल्हा

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस