शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :नागपुरात जनता कर्फ्यूची पोलिसांकडून तयारी : पावणेपाच हजार पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 00:25 IST

नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी नाकेबंदी : विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाईअत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहा : पोलीस आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला गेला आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

जनता कर्फ्यू म्हणजे, लोकांनी, लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेली काळजी होय. लोक एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत तर कुणाचा कुणाला संसर्ग होणार नाही. अर्थात् महामारी, साथरोग पसरणार नाही. त्यावर अंकुश ठेवता येईल या उद्देशाने रविवारचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. त्याला कुणी बाधा पोहचवीत असेल, कारण नसताना घराबाहेर फिरत असेल तर असा व्यक्ती राष्ट्रीय हिताला बाधा पोहचवीत असल्याचे मानले जाईल. स्वत:सोबतच तो त्याच्या कुटुंबीयांच्या आणि इतरांच्याही आरोग्याला धोका पोहचवत असल्याचे मानले जाऊन, अशा व्यक्तींना पोलीस ताब्यात घेतील. पोलिसांनी रविवारच्या जनता कर्फ्यूच्या बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.२५० अधिकारी, ४५०० कर्मचारी
जनता कर्फ्यू नागरिकांनीच यशस्वी करायचा आहे. पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे रस्त्यावर असतील. त्यात २५० अधिकारी आणि ४५०० पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय विविध पोलीस ठाण्यातील मंडळी नेहमीप्रमाणे गस्तीवर राहीलच.३० ठिकाणी नाकेबंदीउपराजधानीत ३० ठिकाणी नाकेबंदी लावली जाणार आहे. या ठिकाणी पोलीस रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करतील. त्यात पायी चालणाऱ्यांपासून, सायकल, दुचाकी, कार तसेच मोठ्या वाहनचालकांचाही समावेश राहील. जनता कर्फ्यूची संधी साधून दारूविक्रेते, अवैध धंदेवाले किंवा काळाबाजारी करणारे आपल्या मालाची इकडून तिकडे वाहतूक करत आहे काय, त्याचीही तपासणी केली जाईल.... तर कारवाई!मनाई असूनही घराबाहेर कशासाठी पडले, त्याची शहानिशा केली जाईल. एखाद्या वाहनात वाहनचालकाव्यतिरिक्त किती जण बसले आहेत, ते कुठून आले, कुठे चालले, त्या सर्वांना घराबाहेर पडण्याची गरज होती का, ते तपासले जाईल. अत्यावश्यक कामाशिवाय कुणी फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पोलीस कारवाईला सामोरे जाऊन विनाकारण पोलीस ठाण्याच्या आवारात वेळ घालविण्याऐवजी घरीच राहणे योग्य ठरणार आहे.अफवांपासून सावधान!कोरोनाच्या संबंधाने काही उपद्रवी आणि काही उत्साही मंडळी सोशल मीडियावर उलटसुलट मेसेज टाकत आहेत. त्यातून झपाट्याने अफवा पसरतात. गैरसमज होतात. नागरिकांनी अशा उपद्रवी मंडळींना दाद देऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शहानिशा केल्याशिवाय कोणतीही भूमिका घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

असा राहील बंदोबस्त

पोलीस उपायुक्त : ८ सहायक आयुक्त : १२पोलीस निरीक्षक : ६५उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक : २०३ पुरुष कर्मचारी : २०२३ महिला पोलीस : २९२ होमगार्डस् : ५०० शीघ्र कृती दल सज्ज शहराला जोडणाऱ्या ८ नाक्यांवर ४० अधिकारी आणि १७६ पोलीस कर्मचारी नाकेबंदीसाठी तैनात राहतील .पोलीस नियंत्रण कक्षात गुन्हे शाखेचे २, आर्थिक गुन्हे शाखेचे १ आणि पोलीस मुख्यालयात ७ पथके सज्ज (राखीव) ठेवली जाणार आहेत. प्रत्येक पथकात १० पुरुष आणि ५ महिला पोलीस राहतील. शीघ्र कृती दल आणि दंगा नियंत्रण पथकेही सज्ज राहणार आहेत. या शिवाय पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वेगळे राहणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसnagpurनागपूर