शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

Corona virus :नागपुरात जनता कर्फ्यूची पोलिसांकडून तयारी : पावणेपाच हजार पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 00:25 IST

नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

ठळक मुद्देठिकठिकाणी नाकेबंदी : विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाईअत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहा : पोलीस आयुक्तांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात रविवारी जनता कर्फ्यू घोषित केला गेला आहे. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात जनता कर्फ्यूला नागरिकांनी स्वयंस्फूर्तच प्रतिसाद द्यावा. अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच नागरिकांनी बाहेर पडावे. अन्यथा कुटुंबीयांसोबत घरीच राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

जनता कर्फ्यू म्हणजे, लोकांनी, लोकांच्या आरोग्यासाठी घेतलेली काळजी होय. लोक एकमेकांच्या संपर्कात आले नाहीत तर कुणाचा कुणाला संसर्ग होणार नाही. अर्थात् महामारी, साथरोग पसरणार नाही. त्यावर अंकुश ठेवता येईल या उद्देशाने रविवारचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. त्याला कुणी बाधा पोहचवीत असेल, कारण नसताना घराबाहेर फिरत असेल तर असा व्यक्ती राष्ट्रीय हिताला बाधा पोहचवीत असल्याचे मानले जाईल. स्वत:सोबतच तो त्याच्या कुटुंबीयांच्या आणि इतरांच्याही आरोग्याला धोका पोहचवत असल्याचे मानले जाऊन, अशा व्यक्तींना पोलीस ताब्यात घेतील. पोलिसांनी रविवारच्या जनता कर्फ्यूच्या बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.२५० अधिकारी, ४५०० कर्मचारी
जनता कर्फ्यू नागरिकांनीच यशस्वी करायचा आहे. पोलीस आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे रस्त्यावर असतील. त्यात २५० अधिकारी आणि ४५०० पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय विविध पोलीस ठाण्यातील मंडळी नेहमीप्रमाणे गस्तीवर राहीलच.३० ठिकाणी नाकेबंदीउपराजधानीत ३० ठिकाणी नाकेबंदी लावली जाणार आहे. या ठिकाणी पोलीस रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची तपासणी करतील. त्यात पायी चालणाऱ्यांपासून, सायकल, दुचाकी, कार तसेच मोठ्या वाहनचालकांचाही समावेश राहील. जनता कर्फ्यूची संधी साधून दारूविक्रेते, अवैध धंदेवाले किंवा काळाबाजारी करणारे आपल्या मालाची इकडून तिकडे वाहतूक करत आहे काय, त्याचीही तपासणी केली जाईल.... तर कारवाई!मनाई असूनही घराबाहेर कशासाठी पडले, त्याची शहानिशा केली जाईल. एखाद्या वाहनात वाहनचालकाव्यतिरिक्त किती जण बसले आहेत, ते कुठून आले, कुठे चालले, त्या सर्वांना घराबाहेर पडण्याची गरज होती का, ते तपासले जाईल. अत्यावश्यक कामाशिवाय कुणी फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पोलीस कारवाईला सामोरे जाऊन विनाकारण पोलीस ठाण्याच्या आवारात वेळ घालविण्याऐवजी घरीच राहणे योग्य ठरणार आहे.अफवांपासून सावधान!कोरोनाच्या संबंधाने काही उपद्रवी आणि काही उत्साही मंडळी सोशल मीडियावर उलटसुलट मेसेज टाकत आहेत. त्यातून झपाट्याने अफवा पसरतात. गैरसमज होतात. नागरिकांनी अशा उपद्रवी मंडळींना दाद देऊ नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शहानिशा केल्याशिवाय कोणतीही भूमिका घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

असा राहील बंदोबस्त

पोलीस उपायुक्त : ८ सहायक आयुक्त : १२पोलीस निरीक्षक : ६५उपनिरीक्षक ते सहायक निरीक्षक : २०३ पुरुष कर्मचारी : २०२३ महिला पोलीस : २९२ होमगार्डस् : ५०० शीघ्र कृती दल सज्ज शहराला जोडणाऱ्या ८ नाक्यांवर ४० अधिकारी आणि १७६ पोलीस कर्मचारी नाकेबंदीसाठी तैनात राहतील .पोलीस नियंत्रण कक्षात गुन्हे शाखेचे २, आर्थिक गुन्हे शाखेचे १ आणि पोलीस मुख्यालयात ७ पथके सज्ज (राखीव) ठेवली जाणार आहेत. प्रत्येक पथकात १० पुरुष आणि ५ महिला पोलीस राहतील. शीघ्र कृती दल आणि दंगा नियंत्रण पथकेही सज्ज राहणार आहेत. या शिवाय पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वेगळे राहणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसnagpurनागपूर