शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:18 IST

Corona virus कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात १०८६ रुग्ण, २६ मृत्यूची नोंद : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन मिळून १९,६३७ चाचण्या झाल्या. यात शहरात १३,७२२ तर ग्रामीणमध्ये ५,९१५ झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत शहरात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.२४ टक्के, ग्रामीणमध्ये १०.६६ टक्के होते. विशेष म्हणजे, पहिली लाट नोव्हेंबरपासून ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी रोजी रुग्णांची संख्या ५०० झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. फेब्रुवारी महिन्यात ११८१ हा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक होता. मार्च महिन्याची सुरुवातच हजारावर रुग्णाने झाली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या ३,५०० ते ४,००० च्या घरात गेली. या महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद २६ मार्च रोजी झाली. ४,०९५ रुग्ण आढळून आले होते. एप्रिल महिन्यात तर रुग्णसंख्येचे जुने सर्व विक्रम मोडित निघाले. ६,५०० ते ७,५०० दरम्यान रुग्णांची भर पडत होती. यामुळे चिंतेचे गंभीर वातावरण तयार झाले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.

आठवडाभरात ७,९०७ रुग्ण, २२४ मृत्यूची भर

आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात ७,९०७ रुग्ण व २२४ मृत्यूची भर पडली. या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद १९ मे रोजी झाली. १३७७ रुग्ण आढळून आले होते तर, सर्वाधिक मृत्यूची नोंद १८ मे रोजी झाली. या दिवशी ४१ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील तीन दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या हजाराजवळ आली आहे. मागील काही दिवसापासून शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

 १६ ते २२ मे दरम्यान रुग्ण व मृत्यूसंख्या

१६ मे : ११३३ रुग्ण : ३० मृत्यू

१७ मे : ९७१ रुग्ण : ३० मृत्यू

१८ मे : ११८९ रुग्ण : ४१ मृत्यू

१९ मे : १३७७ रुग्ण : ३६ मृत्यू

२० मे : ११५१ रुग्ण : २८ मृत्यू

२१ मे : १००० रुग्ण : ३३ मृत्यू

२२ मे : १०८६ रुग्ण २६ मृत्यू

 कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १९,६३७

शहर : ४४५ रुग्ण व ७ मृत्यू

ग्रामीण : ६३१ रुग्ण व ९ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७०,०१७

ए. सक्रिय रुग्ण : १५,२४२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,४६,०३१

ए. मृत्यू : ८,७४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर