शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी शहरातील रुग्णसंख्या ५०० च्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 23:18 IST

Corona virus कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात १०८६ रुग्ण, २६ मृत्यूची नोंद : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संकटाने सगळ्यांचीच वाढविलेली चिंता आता कमी होताना दिसून येत आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ५०० च्या आत होती. शनिवारी शहरात ४४५ रुग्ण व ७ मृत्यू तर ग्रामीणमध्ये ६३१ रुग्ण व ९ मृत्यूची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या १०८६, मृत्यूची संख्या २६ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, २,८७२ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९४.९० टक्क्यांवर पोहचले आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी आरटीपीसीआर व रॅपिड अँटिजन मिळून १९,६३७ चाचण्या झाल्या. यात शहरात १३,७२२ तर ग्रामीणमध्ये ५,९१५ झाल्या. चाचण्यांच्या तुलनेत शहरात पॉझिटिव्हिटीचे प्रमाण ३.२४ टक्के, ग्रामीणमध्ये १०.६६ टक्के होते. विशेष म्हणजे, पहिली लाट नोव्हेंबरपासून ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी रोजी रुग्णांची संख्या ५०० झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढतच गेली. फेब्रुवारी महिन्यात ११८१ हा दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक होता. मार्च महिन्याची सुरुवातच हजारावर रुग्णाने झाली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या ३,५०० ते ४,००० च्या घरात गेली. या महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद २६ मार्च रोजी झाली. ४,०९५ रुग्ण आढळून आले होते. एप्रिल महिन्यात तर रुग्णसंख्येचे जुने सर्व विक्रम मोडित निघाले. ६,५०० ते ७,५०० दरम्यान रुग्णांची भर पडत होती. यामुळे चिंतेचे गंभीर वातावरण तयार झाले होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.

आठवडाभरात ७,९०७ रुग्ण, २२४ मृत्यूची भर

आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात ७,९०७ रुग्ण व २२४ मृत्यूची भर पडली. या आठवड्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद १९ मे रोजी झाली. १३७७ रुग्ण आढळून आले होते तर, सर्वाधिक मृत्यूची नोंद १८ मे रोजी झाली. या दिवशी ४१ रुग्णांचे मृत्यू झाले. मागील तीन दिवसापासून दैनंदिन रुग्णसंख्या हजाराजवळ आली आहे. मागील काही दिवसापासून शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

 १६ ते २२ मे दरम्यान रुग्ण व मृत्यूसंख्या

१६ मे : ११३३ रुग्ण : ३० मृत्यू

१७ मे : ९७१ रुग्ण : ३० मृत्यू

१८ मे : ११८९ रुग्ण : ४१ मृत्यू

१९ मे : १३७७ रुग्ण : ३६ मृत्यू

२० मे : ११५१ रुग्ण : २८ मृत्यू

२१ मे : १००० रुग्ण : ३३ मृत्यू

२२ मे : १०८६ रुग्ण २६ मृत्यू

 कोरोनाची शनिवारची स्थिती

दैनिक चाचण्या: १९,६३७

शहर : ४४५ रुग्ण व ७ मृत्यू

ग्रामीण : ६३१ रुग्ण व ९ मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,७०,०१७

ए. सक्रिय रुग्ण : १५,२४२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,४६,०३१

ए. मृत्यू : ८,७४४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर