शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १६ टक्क्यांनी रुग्ण तर १० टक्क्यांनी वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 00:24 IST

ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.

ठळक मुद्देऑगस्ट महिन्यातील धक्कादायक स्थिती : १,२२७ नव्या रुग्णांची भर : ३४ रुग्णांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येचे जुने विक्रम मोडीत निघाले आहेत. जुलै महिन्याच्या तुलनेत मागील महिन्यात १६.०८ टक्के म्हणजे २४,१६३ रुग्णांची तर १०.६६ टक्के म्हणजे, ९१९ मृतांची वाढ झाली.सोमवारी १,२२७ नव्या रुग्णांची व ३४ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २९,५५५ तर मृतांची संख्या १,०४५ झाली आहे. आज १,२२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९६४ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १,५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. ऑगस्ट महिन्यात भयावह पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ झाली. यामुळे या महिन्यात रुग्णसंख्या वाढणार की कमी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत जे प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करू शकतील तेच कोरोनाला दूर ठेवू शकतील, असे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे.रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत ६४५ पॉझिटिव्हनागपूर जिल्ह्यात आज १,९३० रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात ६४५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. १,८९३ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात ५८२ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. एम्समध्ये ७८, मेडिकलमध्ये ७४, मेयोमध्ये ५०, माफसूमध्ये ७३, नीरीमध्ये ५१ तर खासगी प्रयोगशाळेतून २५६ पॉझिटिव्ह आले. ९,२६६ रुग्ण उपचाराखाली असून आतापर्यंत १९,२४४ रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०१५, ग्रामीण भागातील २११ तर एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे.३१ दिवसांत ९१९ मृत्यूजुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले तर मागील महिन्याच्या ३१ दिवसात ९१९ मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात दोन मृत्यूची नोंद होती. परंतु त्यानंतर वाढत्या रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्या वाढतच गेली. मे महिन्यात ११, जून महिन्यात १५, जुलै महिन्यात ९८ मृत्यू झाले. जुने व नियंत्रणात नसलेले आजार, वाढलेले वय व उपचारात झालेला उशीर हे बहुसंख्य रुग्णांमध्ये मृत्यूचे कारण ठरले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ३,८२३बाधित रुग्ण : २९,५५५बरे झालेले : १९,२४४उपचार घेत असलेले रुग्ण : ९,२६६मृत्यू : १,०४५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर