शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृतांची संख्या ५०० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 22:56 IST

कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे.

ठळक मुद्दे६२३ नव्या रुग्णांची भर, २४ मृत्यू : ग्रामीणमध्ये ८५ तर शहरात ५३८ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. पाच महिन्यात ५०० वर कोरोनाबाधितांचा जीव गेला आहे. सोमवारी यात २४ रुग्णांच्या मृत्यूची भर पडली. मृतांची संख्या ५१२ वर गेली आहे. विशेष म्हणजे, मागील १७ दिवसात ३८१ मृत्यू झाले आहेत, तर याच महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंदही झाली आहे. आज ६२३ नवे रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या १४,६१३ वर पोहचली आहे. बाधितांमध्ये ग्रामीणमधील ८५ तर शहरातील ५३८ रुग्ण आहेत.नागपूर जिल्ह्यातील एकूण मृतांमध्ये ग्रामीण भागातील ८२, शहरातील ३६७ तर जिल्हाबाहेरील ६३ मृत्यू आहेत. मेयोमधील मृतांमध्ये संत्रा मार्केटमधील ४५ वर्षीय पुरुष, खापरखेडा येथील २० वर्षीय युवक, शांतिनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, जबलपूर येथील १७ वर्षीय मुलगी, बजेरिया येथील ६० वर्षीय पुरुष, साईमंदिर परिसर येथील ५६ वर्षीय महिला, हिंगणा रोड येथील ५२ वर्षीय पुरुष, मध्य प्रदेश येथील ६५ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथील ३२ वर्षीय महिला, इतवारी येथील ५० वर्षीय पुरुष, प्रेमनगर येथील ७५ वर्षीय महिला, मानेवाडा दौलतनगर येथील ६८ वर्षीय पुरुष, खलासी लाईन मोहननगर येथील ७७ वर्षीय पुरुष, भारतनगर येथील ५८ वर्षीय पुरुष, जरीपटका येथील ७२ वर्षीय महिला, हजारीपहाड येथील ४४ वर्षीय पुरुष, इतवारी येथील ७३ वर्षीय पुरुष, कळमना येथील ६० वर्षीय महिला, वाडी येथील ३४ वर्षीय महिला, गांजाखेत येथील ७४ वर्षीय महिला, दसरा रोड येथील ६० वर्षीय पुरुष, पार्वतीनगर येथील ६४ वर्षीय पुरुष, बगडगंज येथील ७० वर्षीय महिला, पारडी येथील ६५ वर्षीय महिला, महाल झेंडा चौक येथील ६२ वर्षीय पुरुष व महाल येथील ४३ वर्षीय पुरुष आदींचा समावेश होता. यात काही मृतांची नोंद रविवारी झाली आहे.अ‍ॅन्टिजन चाचणीत ३१६ पॉझिटिव्हरॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत आज ३१६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अर्ध्या तासात अहवाल मिळत असल्याने व दहा झोनमध्ये नि:शुल्क व्यवस्था केल्याने याचा फायदा होताना दिसून येत आहे. मेडिकलच्या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर केलेल्या चाचणीत ७२, मेयोच्या प्रयोगशाळेत ९८, एम्सच्या प्रयोगशाळेत ४४, नीरीच्या प्रयोगशाळेत ४ व खासगी लॅबमध्ये ८९ अशा एकूण ६२३ रुग्णांची नोंद झाली.होम आयसोलेशनमध्ये २७१४ रुग्णकोविड पॉझिटिव्ह असताना लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले २७१४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची सोय नाही असे ५३७ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये मध्यम व गंभीर लक्षणे असलेले ३३७ रुग्ण आहेत, तर मेडिकलमध्ये ३७७, मेयोमध्ये ३१५, एम्समध्ये ४३ तर कामठी रुग्णालयात १५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण ७,१८६ रुग्ण उपचाराखाली आहेत. आज ३७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६,९१५ झाली आहे.मृतांचे प्रमाण ३.५० टक्केजिल्ह्यात एप्रिल महिन्यात दोन मृतांची संख्या होती. त्यानंतर मे महिन्यात १२, जून महिन्यात १६ तर जुलै महिन्यात १०१ मृतांची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक म्हणजे ३८१ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.५० टक्के मृत्यू झाले आहेत. धक्कादायक म्हणजे, भारतात मृत्यूचे प्रमाण १.९३ टक्के तर महाराष्ट्रात ३.३८ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे.दैनिक संशयित : २३८बाधित रुग्ण : १४,६१३बरे झालेले : ६,९१५उपचार घेत असलेले रुग्ण : ७,१८६मृत्यू : ५१२महिन्यानुसार मृतांची संख्याएप्रिल २मे १२जून १६जुलै १०१ऑगस्ट ३८१