शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

कोरोनामुळे आईस्क्रीम उद्योग ठप्प : ३५० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 9:36 PM

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआईस्क्रीमविना संपूर्ण सिझन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे. ते भरून निघणे कठीण असल्याचे मत पार्लरच्या संचालकांनी व्यक्त केले.आईस्क्रीम उद्योगाचा पीक सिझन मार्चपासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत चालतो. आईस्क्रीमची मागणी वाढण्यापूर्वीच कोरोना लॉकडाऊनने ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद झाली. दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा भरून निघणे कठीण आहे. जून महिन्यातही दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षीचा गर्मीचा सिझन विक्रीविना जाणार आहे. विक्रीच नसल्यामुळे आईस्क्रीम कंपन्यांनीही उत्पादन बंद केले तर काहींनी थोडेफार सुरू ठेवले. परराज्यातील कंपन्यांच्या आईस्क्रीमची नागपुरात आवक झालीच नाही. त्याचा परिणाम असा की, आईस्क्रीम निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी नाहीच. कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झालेत. याशिवाय विक्री पार्लरमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला. या उद्योगातील सर्वच रोजगार ठप्प झाला.सिझनमध्ये होते वर्षभराची कमाईमार्च महिन्यात दहा दिवस आणि एप्रिल व मे महिन्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने थोडीफार कमाई नव्हे तर आईस्क्रीम पार्लरमधील फ्रीजरच्या देखरेखीसाठी अतिरिक्त खर्च आणि विजेचे बिल भरावे लागत आहे. या व्यवसायात वर्षभराची कमाई उन्हाळ्याच्या तीन महिन्यात होते. पुढे लग्नसराई आणि समारंभ वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात विक्री होणार नाही. नागपुरात ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लर आहेत. या सर्वांना नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्याचा सिझन पाहता कंपन्यांनी पूर्वीच कच्च्या मालाची खरेदी केली होती. तो माल खराब झाला आहे. त्याचाही फटकाही कंपन्यांना बसला आहे.बर्फ कंपन्यांना नुकसानउन्हाळ्यात आईस्क्रीमप्रमाणे बर्फ गोळ्यांनाही मागणी असते. पण यंदा ही दुकाने थाटली नाहीत. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आणि कंपन्यांनी बर्फ निर्मितीच बंद केली. लग्नसमारंभ नसल्याने मागणीच ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर