शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

विदर्भात कोरोनाने २५ दिवसात १४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 01:13 IST

विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे.

ठळक मुद्देमृतांची एकूण संख्या २९९ : सर्वाधिक मृत्यू अकोल्यात५१ ते ६० या वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. २५ जुलै रोजी मृतांची नोंद २९९ झाली. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण २.५९ टक्के आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात केवळ एका मृताची नोंद असताना मागील २५ दिवसात १४५ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ५१ ते ६० या वयोगटात आहेत. कोरोनाच्या विळख्यात आता विदर्भाचे ११ ही जिल्हे आले आहेत. लॉकडाऊन अनलॉक होताच रुग्णांसोबतच मृत्यूची संख्याही वाढू लागली आहे. नागपूर विभागात येत असलेल्या सहा जिल्ह्यापैकी मागील आठवड्यापर्यंत दोन जिल्ह्यात मृत्यूची नोंद नव्हती. मात्र यातील भंडारा जिल्ह्यात एका मृत्यूची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही मृत्यूची नोंद झालेली नाही. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मृत्यूची नोंद आहे.नागपूर विभागात मृत्यूची संख्या ९१नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाले आहेत. २५ जुलै सायंकाळपर्यंत ७६ मृत्यूची नोंद होती. गोंदिया जिल्ह्यात तीन, वर्धा जिल्ह्यात नऊ, गडचिरोली एक व भंडारा जिल्ह्यात दोन मृत्यू आहेत. एकूण मृतांची संख्या ९१ झाली आहे.अमरावती विभागात मृत्यूची संख्या २०८अमरावती विभागात सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्ह्यात आहेत. येथे १०० मृत्यू झाले आहेत. याशिवाय, बुलडाण्यात २५, वाशिम जिल्ह्यात नऊ, यवतमाळ जिल्ह्यात २७ तर अमरावती जिल्ह्यात ४७ मृत्यूची नोंद आहे. अशा एकूण २०८ मृत्यूची नोंद झाली आहे.या महिन्यात ५४ मृतांची वाढमार्च महिन्यात विदर्भात केवळ एका मृत्यूची नोंद होती. मात्र नंतर रुग्णसंख्या वाढत गेली तशी मृतांची संख्याही वाढली. एप्रिल महिन्यात १२, मे महिन्यात ५४, जून महिन्यात ९१ तर जुलै महिन्याच्या २५ तारखेपर्यंत १४५ मृतांची नोंद झाली. गेल्या महिन्याच्या तुलनेत ५४ मृतांमध्ये वाढ झाली. - असे वाढले मृत्यू महिना मृत्यूची संख्या मार्च ०१ एप्रिल १२ मे ५४ जून ९१ जुलै १४५ (२५ जुलैपर्यंत)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूVidarbhaविदर्भ