शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गोड बोलण्यापेक्षा सहकार्यातून विकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 8:00 AM

गुड बोला.. गोड बोला या लोकमतच्या प्रभावी उपक्रमात गोड बोलण्याला स्पष्टतेची किनार असण्याविषयी सांगत आहेत, नासुप्र सभापती व महानगर आयुक्त शीतल उगले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. नियमानुसार काम होत नसेल तर स्पष्ट सांगणे गरजचे आहे. परंतु त्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होत असेल तर तिच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत. अशी भूमिका मांडल्यास समारेच्याचाही गैरसमज होणार नाही. हेही तितकेच महत्त्वाचे.वस्थापनात लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरिक व कर्मचारी यांच्याशी नुसते गोड बोलून समस्या सुटणार नाही. कामातही गोडी असली पाहिजे. संस्थेशी संबंधित सर्वांच्या सहकार्याने व समन्वयातून विकास व जनतेची कामे व्हावीत, असे मला वाटते.नागपूर सुधार प्रन्यास, महानगर नियोजन प्राधिकरण संदर्भात अनेकजण कामे घेऊ न येतात. काही लोकांच्या तक्रारीही असतात. येणाऱ्या व्यक्तीशी नुसते गोड बोलून त्यांचे समाधान होणार नाही, समस्याही सुटणार नाही. त्याची नेमकी समस्या जाणून ती सोडविणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या सोडण्यात कायदेशीर अडचणी असल्यास आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला त्याला देणे महत्त्वाचे वाटते. गोड बोलण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे.आयुक्त व सभापती असल्याने दररोज अनेक नागरिक समस्या घेऊ न येतात. सर्वांसोबत आपण चांगले बोलतो. अशावेळी येणाऱ्यांशी नुसते गोड बोलून भागणार नाही. संबंधित व्यक्तीची समस्या मार्गी लागण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याची गरज असते. यासाठी समन्वय महत्त्वाचा असतो. सोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांशी सुसंवाद तितकाच महत्त्वाचा आहे. यातून अनेक प्रश्न मार्गी लागण्याला मदत होते. समस्या घेऊन येणाऱ्याशी नुसते गोड बोलून परत केले तर त्याची बोळवण होईल. त्याची समस्या कशी सुटेल यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो. यात अधिकारी व सहकाऱ्यांची सकारात्मक भूमिका तितकीच महत्त्वाची असते.शासकीय कार्यालयात येणाऱ्यांचे काम व्हावे अशी अपेक्षा असते. त्याची अकारण अडवणूक न करता त्याचे काम तातडीने मार्गी लागले तर संबंधितांचे समाधान होते. काम न करता नुसते गोड बोलणे योग्य नाही. अशा गोड बोलण्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे, समजावून सांगणे आवश्यक आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती