शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

पाणवठ्यांवर ठणठणाट - वन्यजीव तहानलेले एनटीसीएच्या सूचना : हळूहळू पाणवठे बंद करा

By admin | Updated: May 10, 2014 00:37 IST

नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने...

गजानन चोपडे - नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पाणवठ्यांवर ठणठणाट आहे. असे केल्यास बाहेरील वन्यजीव पाण्याच्या शोधात प्रकल्पात शिरतील, असा जावईशोध प्राधिकरणाने लावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मानव-प्राणी संघर्ष थांबावा, पाण्याच्या शोधात वन्यजीवांनी लोकवस्तीकडे येऊ नये, यासाठी प्रकल्पालगत रस्त्याच्या कडेला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागताच यात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा हे पाणवठे कोरडेठाक असल्याने अनेक वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अनेकांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड यांना एसएमएसद्वारे आपली प्रतिक्रियादेखील नोंदविली आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये ७० तर कोअर झोनमध्ये १०८ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असल्याने कृत्रिम पाणवठे बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वाघ किंवा बिबटसारखे हिंस्त्र प्राणी बाहेरून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येत असल्याचा दावा प्रकल्प व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी तहान भागविण्यासाठी वन्यजीव मोठ्या संख्येने कृत्रिम पाणवठ्यांवर येतात आणि त्यात पाणी नसल्याने लोकवस्तीच्या दिशेने जातात. २१ एप्रिल रोजी बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड या गजबजलेल्या वस्तीतील एका घरात भरदिवसा एक बिबट्या शिरला. त्याने घरातील महिलेवर हल्ला चढवून तिला जखमी केले. मानेकडे जाणारा बिबट्याचा पंजा त्या महिलेने मोठ्या हिमतीने दूर सारला. बघ्यांची गर्दी ही झुंज श्वास रोखून पाहात होती. महिलेने पूर्ण शक्तिनिशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. मोठा अनर्थ टळला. अन्यथा गावात अनेकांना त्याने जखमी केले असते. दर उन्हाळ्यात बिबट गावात शिरल्याच्या घटना ऐकू येतात. मानव- वन्यजीव संघर्षांत आजतागायत अनेकांचा बळी गेला आहे. पण वन विभाग या बाबीकडे हवे त्याप्रमाणात लक्ष देत नसल्याची खंत वन्यजीवप्रेमी निखिल तांबेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फक्त वाघ आणि बिबटचाच विचार करून चालणार नाही तर कृत्रिम पाणवठ्यांवर इतर प्राणीही येतात, हे वन विभागाने लक्षात घ्यायला हवे. ताडोबातील कोळसा, तेलिया, पांढरपवनी या तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी कृत्रिम पाणवठ्यांमधील स्थिती भीषण पाणी टंचाई दर्शविणारी आहे.