शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाणवठ्यांवर ठणठणाट - वन्यजीव तहानलेले एनटीसीएच्या सूचना : हळूहळू पाणवठे बंद करा

By admin | Updated: May 10, 2014 00:37 IST

नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने...

गजानन चोपडे - नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पाणवठ्यांवर ठणठणाट आहे. असे केल्यास बाहेरील वन्यजीव पाण्याच्या शोधात प्रकल्पात शिरतील, असा जावईशोध प्राधिकरणाने लावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मानव-प्राणी संघर्ष थांबावा, पाण्याच्या शोधात वन्यजीवांनी लोकवस्तीकडे येऊ नये, यासाठी प्रकल्पालगत रस्त्याच्या कडेला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागताच यात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा हे पाणवठे कोरडेठाक असल्याने अनेक वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अनेकांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड यांना एसएमएसद्वारे आपली प्रतिक्रियादेखील नोंदविली आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये ७० तर कोअर झोनमध्ये १०८ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असल्याने कृत्रिम पाणवठे बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वाघ किंवा बिबटसारखे हिंस्त्र प्राणी बाहेरून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येत असल्याचा दावा प्रकल्प व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी तहान भागविण्यासाठी वन्यजीव मोठ्या संख्येने कृत्रिम पाणवठ्यांवर येतात आणि त्यात पाणी नसल्याने लोकवस्तीच्या दिशेने जातात. २१ एप्रिल रोजी बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड या गजबजलेल्या वस्तीतील एका घरात भरदिवसा एक बिबट्या शिरला. त्याने घरातील महिलेवर हल्ला चढवून तिला जखमी केले. मानेकडे जाणारा बिबट्याचा पंजा त्या महिलेने मोठ्या हिमतीने दूर सारला. बघ्यांची गर्दी ही झुंज श्वास रोखून पाहात होती. महिलेने पूर्ण शक्तिनिशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. मोठा अनर्थ टळला. अन्यथा गावात अनेकांना त्याने जखमी केले असते. दर उन्हाळ्यात बिबट गावात शिरल्याच्या घटना ऐकू येतात. मानव- वन्यजीव संघर्षांत आजतागायत अनेकांचा बळी गेला आहे. पण वन विभाग या बाबीकडे हवे त्याप्रमाणात लक्ष देत नसल्याची खंत वन्यजीवप्रेमी निखिल तांबेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फक्त वाघ आणि बिबटचाच विचार करून चालणार नाही तर कृत्रिम पाणवठ्यांवर इतर प्राणीही येतात, हे वन विभागाने लक्षात घ्यायला हवे. ताडोबातील कोळसा, तेलिया, पांढरपवनी या तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी कृत्रिम पाणवठ्यांमधील स्थिती भीषण पाणी टंचाई दर्शविणारी आहे.