शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने केली मोठी खेळी, ठाकरेंचे बहुसंख्य उमेदवार ठरले असते बाद; पण ऐनवेळी डाव उलटला अन्...
2
ठाण्यात शिंदेसेनेने जागा वाटपामध्ये भाजपचा केला ‘करेक्ट कार्यक्रम’; 'त्या' नऊ जागा बांधल्या भाजपच्या गळ्यात 
3
"तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ"; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या असीम मुनीरचा इशारा
4
मनसेच्या मुंबईतील उमेदवारांना राज ठाकरेंचा मोलाचा सल्ला, म्हणाले, ‘तुम्हाला ऑफर येतील, पण…’
5
'ऑपरेशन सिंदूर सुरूच...' लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला करून दिली आठवण
6
"जितकी मिरची ठाकरे गटाला...", नितेश राणेंचा उद्धवसेनेवर हल्ला, 'उत्तर भारतीय महौपार' मुद्द्यावर काय बोलले?
7
Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
8
टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?
9
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
10
बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले...
11
२०२६ मध्ये या ५ राज्यात रंगणार सत्तेचा सारीपाट, बाजी कोण मारणार, NDA की ‘INDIA’?
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद! 'या' दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर घातली बंदी
13
जळगावात भाजपाला धक्का, माजी महापौरांचा अर्ज बाद; AB फॉर्ममधील त्रुटीचा उद्धवसेनेलाही फटका
14
Healthy Diet: अन्न तेच पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? त्यामागे आहेत ५ सिक्रेट 
15
कोकण गाजवल्यावर शिंदेचा फायर ब्रँड नेता मुंबईत; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दिली मोठी जबाबदारी
16
“आम्ही दोघं राजा-राणी…” विरुष्काचं प्रेम अन् MS धोनी–साक्षीची ‘राजकुमारी’सोबतची खास फ्रेम चर्चेत
17
भारताची चीनवर कडी...! 'या' उत्पादनातही मागे टाकलं; ड्रॅगनची चिंता वाढली
18
Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का
19
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
20
उड्डाणापूर्वी एअर इंडियाचा पायलट दारू प्यायला; अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात, DGCA कारवाई करणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठ्यांवर ठणठणाट - वन्यजीव तहानलेले एनटीसीएच्या सूचना : हळूहळू पाणवठे बंद करा

By admin | Updated: May 10, 2014 00:37 IST

नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने...

गजानन चोपडे - नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पाणवठ्यांवर ठणठणाट आहे. असे केल्यास बाहेरील वन्यजीव पाण्याच्या शोधात प्रकल्पात शिरतील, असा जावईशोध प्राधिकरणाने लावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मानव-प्राणी संघर्ष थांबावा, पाण्याच्या शोधात वन्यजीवांनी लोकवस्तीकडे येऊ नये, यासाठी प्रकल्पालगत रस्त्याच्या कडेला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागताच यात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा हे पाणवठे कोरडेठाक असल्याने अनेक वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अनेकांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड यांना एसएमएसद्वारे आपली प्रतिक्रियादेखील नोंदविली आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये ७० तर कोअर झोनमध्ये १०८ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असल्याने कृत्रिम पाणवठे बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वाघ किंवा बिबटसारखे हिंस्त्र प्राणी बाहेरून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येत असल्याचा दावा प्रकल्प व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी तहान भागविण्यासाठी वन्यजीव मोठ्या संख्येने कृत्रिम पाणवठ्यांवर येतात आणि त्यात पाणी नसल्याने लोकवस्तीच्या दिशेने जातात. २१ एप्रिल रोजी बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड या गजबजलेल्या वस्तीतील एका घरात भरदिवसा एक बिबट्या शिरला. त्याने घरातील महिलेवर हल्ला चढवून तिला जखमी केले. मानेकडे जाणारा बिबट्याचा पंजा त्या महिलेने मोठ्या हिमतीने दूर सारला. बघ्यांची गर्दी ही झुंज श्वास रोखून पाहात होती. महिलेने पूर्ण शक्तिनिशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. मोठा अनर्थ टळला. अन्यथा गावात अनेकांना त्याने जखमी केले असते. दर उन्हाळ्यात बिबट गावात शिरल्याच्या घटना ऐकू येतात. मानव- वन्यजीव संघर्षांत आजतागायत अनेकांचा बळी गेला आहे. पण वन विभाग या बाबीकडे हवे त्याप्रमाणात लक्ष देत नसल्याची खंत वन्यजीवप्रेमी निखिल तांबेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फक्त वाघ आणि बिबटचाच विचार करून चालणार नाही तर कृत्रिम पाणवठ्यांवर इतर प्राणीही येतात, हे वन विभागाने लक्षात घ्यायला हवे. ताडोबातील कोळसा, तेलिया, पांढरपवनी या तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी कृत्रिम पाणवठ्यांमधील स्थिती भीषण पाणी टंचाई दर्शविणारी आहे.