शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

कुलरचा ३०० कोटींचा व्यवसाय ठप्प; ५० हजार कर्मचारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:32 IST

कोरोना लॉकडाऊनने कुलरचे उत्पादन आणि विक्री ठप्प झाल्याने नागपुरात जवळपास ३५० पेक्षा जास्त उत्पादकांचे कारखाने बंद असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आर्थिक संकटात आहेत.

ठळक मुद्दे३५० उत्पादकांकडे माल विक्रीविना पडून 

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनने कुलरचे उत्पादन आणि विक्री ठप्प झाल्याने नागपुरात जवळपास ३५० पेक्षा जास्त उत्पादकांचे कारखाने बंद असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. वर्षभर चालणाऱ्या या उद्योगाला जवळपास ३०० कोटींचा फटका बसल्याची माहिती उत्पादक असोसिएशनने लोकमतशी बोलताना दिली.विदर्भ कुलर उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष विजय खेर म्हणाले, कोरोना लॉकडाऊनमुळे कुलर निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. कुलर निर्मितीत नागपूर देशाची मुख्य बाजारपेठ आहे. नागपुरातून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा या राज्यांमध्ये कुलर पाठविले जातात. तसे पाहता वर्षभरच कुलरच्या पार्टची निर्मिती होत असते. पण मुख्य निर्मिती आॅक्टोबरपासून सुरू होते. तेव्हापासून कच्च्या मालाची खरेदी-विक्री करण्यात येते. नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला दोन लाख कुलरची निर्मिती होते. पण आता सर्वच कारखाने बंद आहेत. ज्यांच्याकडे माल होता, त्यांनी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत कुलरची विक्री केली. पण राज्य शासनाने १९ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर कुलर निर्मिती आणि मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे तयार झालेले कुलर कारखान्यात तर डिसेंबरपासून डीलर्सकडे पाठविलेले कुलर विक्रीविना पडून आहेत. यामुळे संपूर्ण उलाढाल थांबली आहे. ३ मे रोजी लॉकडाऊन हटल्यानंतरही कुलर विक्रीला जास्त वेळ मिळणार नाही. सिझननंतर माल राहिला तर स्टॉक कुठे ठेवणार, हा मोठा प्रश्न आहे.

दोन वर्ष व्यवसाय उठणार नाहीकुलर निर्मिती आणि विक्रीची साखळीच थांबल्याने बँकेचे कर्ज आणि व्याज फेडणार कसे, यावर उत्पादक चिंतेत आहेत. यावर्षी माल विकल्या न गेल्यास पुढील वर्षी नवीन कुलर तयार करण्याची हिंमत कुणीही करणार नाही. कोरोनाने लग्नाचा सिझन वाया गेला तर उन्हाळाही व्यवसायाविना जात आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्ष हा व्यवसाय उठणार नाही. उत्पादकांकडे कच्च्या माल मोठ्या प्रमाणात पडून आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर फिनिश माल बनविणे परवडणार नाही. तसेच जानेवारीपासून मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत विकलेल्या मालाची उधारी वसूल होण्याची सध्यातरी गॅरंटी नाही. लॉकडाऊननंतर कारखाने सुरू झाल्यानंतरही मालवाहतूक होणार नाही. कच्चा माल कसा आणणार, हासुद्धा प्रश्न आहे. नागपूर रेड झोनमध्ये असल्याने नव्याने कुलर निर्मिती सुरू करणे शक्य नसल्याचे खेर यांनी स्पष्ट केले.आर्थिक दिलासा देण्यासाठी असोसिएशनने १० दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई-मेल पाठविले असून त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे फॉरवर्ड केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. शासनाने मदत करावी, अशी असोसिएशनची मागणी आहे.नागपुरी कुलरला भारतात मागणीविदर्भ कुलर उत्पादक असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश अवचट म्हणाले, कोरोनामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला असून दोन वर्ष स्थिती सुधारण्याची शक्यता नाही. या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो हात बेकार झाले आहेत. लॉकडाऊन हटल्यानंतरही शेवटचा सिझन मिळेल, पण रेड झोनमुळे आम्ही निर्मितीचा आग्रह धरू शकत नाही. नागपूरच्या गर्मीत कुलर विक्री व्हावी, असे आमचे मत आहे. इंडस्ट्रीमध्ये कुलर तयार आहेत, विक्रीची परवानगी मिळावी. तसे झाल्यास बँकांचे व्याज थोडेफार कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या व्यवसायाची जाण आहे. त्यामुळे त्यांनी या व्यवसायाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतरच आर्थिक संकट दूर होणार आहे. कर्मचाºयांना मार्चचे पगार दिले आहेत. पण उत्पादकच आर्थिक संकटात असल्याने एप्रिलचे पगार कसे देणार, हा प्रश्न आहे. शासनाकडून या व्यवसायाला आर्थिक मदतीची गरज असल्याचे अवचट यांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय