शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परीक्षेचे वेळापत्रक बदलले नाही, तर अधिकाऱ्यांविरोधात अवमानना याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:10 IST

रवींद्र फडणवीस यांचा इशारा : शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सूचनेनुसार संपूर्ण एप्रिलपर्यंत वाढविलेल्या प्राथमिक व माध्यमिकच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले नाही, तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात अवमानना दाखल करणार, असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी दिला आहे.

इयत्ता १ ते ८ वीच्या वार्षिक परीक्षा २५ एप्रिलपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने परीक्षेसंबंधी निर्णय घ्यावा, अशा सूचना निकाल देताना दिल्या आहेत. या आदेशाचे पत्र शिक्षण उपसंचालक, तसेच प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती फडणवीस यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. 

'पॅट' प्रश्नपत्रिका व्हायरल, परीक्षा रद्द करा

  • शैक्षणिक परिषदेने दिलेल्या आदेशानुसार वार्षिक परीक्षेच्या काळात नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पेंट) परीक्षा ८ एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी या परीक्षेचा पुरता फज्जा उडाला. परिषदेने विद्यार्थ्यांच्या तुलनेत अर्ध्याच प्रश्नपत्रिका पाठविल्या.
  • या सात पानी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्याचे शाळांना सांगण्यात आले. यामुळे अनेक ठिकाणी या प्रश्नपत्रिकाच यू-ट्यूबवर व्हायरल झाल्याचे रवींद्र फडणवीस यांनी सांगितले.
  • यामुळे ही परीक्षा पूर्णपणे रद्द करा किंवा शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला घ्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली. उन्हाच्या तडाक्यामुळे एकाच दिवशी दोन परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचेही ते म्हणाले.

अधिकाऱ्यांनी शिक्षणाची खिचडी केली, मंत्री खुळेशिक्षण विभागात कोणताही नवा आयएएस अधिकारी येतो आणि डोक्यात येईल, ते निर्णय घेतो. राज्याचे शिक्षणमंत्री खुळ्यासारखे त्यांच्या 'हो ला हो' करतात, असा आरोप फडणवीस यांनी केला. या अधिकाऱ्यांना विदर्भात ४५ अंशांच्या वर जाणाऱ्या तापमानाची परिस्थिती माहिती नाही का, असा सवाल त्यांनी केला. खेड्यापाड्यातील विद्यार्थी दोन-तीन किमी पायी चालत शाळा गाठतात. अनेक शाळांमध्ये वीज नाही, पंखे नाहीत. या स्थितीत उन्हामुळे विद्यार्थ्यांना काही झाले तर शाळा किंवा शिक्षकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षण