शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ग्राहक मंच : ग्राहकाला फसविणाऱ्या दि कंट्री क्लब इंडियाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:22 IST

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे आदेश जारी करून मुंबई येथील दि कंट्री क्लब इंडिया या कंपनीला दणका दिला आहे.

ठळक मुद्दे८५ हजार रुपये व्याजासह परत करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात ग्राहक हिताचे आदेश जारी करून मुंबई येथील दि कंट्री क्लब इंडिया या कंपनीला दणका दिला आहे.तक्रारकर्त्या ग्राहकाकडून घेतलेले ८५ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे, असा आदेश क्लबला देण्यात आला आहे. व्याज १७ जून २००८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू होणार आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम क्लबनेच द्यायची आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी क्लबला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला.डॉ. प्रवीण राठी असे ग्राहकाचे नाव असून, ते नागपूर येथील रहिवासी आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी राठी यांची भेट घेऊन अमरावती रोडवर आधुनिक क्लब सुरू करणार असल्याचे सांगितले होते. या क्लबमध्ये हेल्थ क्लब, लॉन टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल, जीम, कोल्ड वॉटर जकोजी, रेस्टॉरेंट, स्नुकर टेबल, टेबल टेनिस, बार रुम, डान्स फ्लोअर, जॉगिंग ट्रॅक, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल इत्यादी सुविधा राहणार आहेत. सिनेकलावंत, अधिकारी, न्यायमूर्ती, डॉक्टर्स, खेळाडू, व्यावसायिक आदी व्यक्ती क्लबचे सदस्य आहेत, अशी माहितीही राठी यांना देण्यात आली होती. राठी यांनी त्यावर विश्वास ठेवून १२ व १३ जून २००८ रोजी ८५ हजार रुपये सदस्यता शुल्क कंपनीकडे जमा केले. त्यानंतर त्यांनी सात वर्षापर्यंत क्लब सुरू होण्याची प्रतीक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. कंपनीने क्लब सुरू केला नाही. परिणामी, राठी यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. त्यालाही उत्तर देण्यात आले नाही. शेवटी राठी यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर सादर करून तक्रारीतील सर्व आरोप फेटाळून लावले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. परंतु, मंचने विविध बाबी लक्षात घेता ती तक्रार अंशत: मंजूर करून राठी यांना दिलासा दिला.अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंबनागपूर येथे क्लब सुरू करणे अशक्य होते तर, त्याची तक्रारकर्त्याला माहिती देऊन दिलगिरी व्यक्त करणे व तक्रारकर्त्याची रक्कम परत करणे आवश्यक होते. परंतु, कंपनीने तसे काहीच केले नाही. त्यामुळे कंपनीने सेवेत त्रुटी ठेवल्याचे व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे सिद्ध होते. करिता, तक्रारकर्ता शारीरिक-मानसिक त्रासाकरिता व तक्रारीच्या खर्चाची भरपाई मिळण्यास पात्र ठरतो असे निरीक्षण मंचने या निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे