शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपुरातील फ्लाय अ‍ॅशवर बेंगळुरूतील बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:36 IST

fly ash, nagpur news औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालगाडीने ७८०० टन राख रवाना : मध्य रेल्वेचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षाकाठी हजारो टन कोळशाची राख तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. ही राख नद्यांमध्ये किंवा जमिनीवर टाकली जाते. जमिनीवर टाकलेली राख हवेत उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय ही राख इमारतीच्या बांधकामात वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मध्य रेल्वे नागपूर विभागातील वरोरा येथील औष्णिक वीज केंद्रातून निघालेली कोळशाची राख अ‍ॅश टॅक कंपनीने नाममात्र दरात खरेदी करून पहिल्यांदाच मालगाडीने पाठविण्यात आली. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या राखेपासून विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे आहे. यामुळे रोजगारही उपलब्ध होतो.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर