शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नागपुरातील फ्लाय अ‍ॅशवर बेंगळुरूतील बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:36 IST

fly ash, nagpur news औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमालगाडीने ७८०० टन राख रवाना : मध्य रेल्वेचा पुढाकार

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : औष्णिक वीज केंद्रातून निघालेली राख हवेत जाते. त्यामु्ळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही राख घातक असते. त्यामुळे मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाने ही राख बेंगळुरूला पाठविण्यासाठी मालगाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यानुसार ७८०० टन राख ११६ वॅगनच्या माध्यमातून पाठविण्यात आली. या राखेचा वापर बांधकामासाठी उपयोगात येणाऱ्या ब्रिक्ससाठी करण्यात येणार आहे.

राज्यातील १६ औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातून वर्षाकाठी हजारो टन कोळशाची राख तयार होते. राखेमुळे प्रदूषण वाढते. ही राख नद्यांमध्ये किंवा जमिनीवर टाकली जाते. जमिनीवर टाकलेली राख हवेत उडत असल्याने नागरिकांना त्रास होतो. यावर उपाय ही राख इमारतीच्या बांधकामात वापरण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मध्य रेल्वे नागपूर विभागातील वरोरा येथील औष्णिक वीज केंद्रातून निघालेली कोळशाची राख अ‍ॅश टॅक कंपनीने नाममात्र दरात खरेदी करून पहिल्यांदाच मालगाडीने पाठविण्यात आली. यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनात मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्यासह वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या राखेपासून विटा बनवण्याचा उद्योग नागपूर जिल्ह्यासह विदर्भ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथे आहे. यामुळे रोजगारही उपलब्ध होतो.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर